Wednesday, December 2, 2009

ओसरटा पूर

जात आहे दूर मी
वाईट आन् निष्ठुर मी
उधलुनि पीक सारे
ओसरटा पूर मी

-अभी

Sunday, November 8, 2009

अम्रुताचा प्रितम...


जब वक्त को वक्त याद आता है
कभी शाम हो गयी होती है
कभी रात उतर आयी है
और कभी दिन चढ आया है
उसने सिर्फ जिस्म छोडा है
साथ नही...

- इम्रोझ


पुन्हा एकदा अम्रुता प्रितम यांच्या शी भेट झाली. लोकसत्ता च्या दिवाळी अंकात अम्रुताचा प्रितम हा एक नाजुक लेख आला आहे. मि येथे तो टाकणार होतो, लिहायला ही घेतला होतो पण कुणास ठावुक टाकावसा नाही वाटला.

मला अम्रुता-इम्रोझ च्या दिल्ली च्या घरी जायचे आहे.....का माहीत नाही.


-अभी

Saturday, November 7, 2009

धुंदी (?)

आज ओफिस ला जाताना i-Pod कानात लावुन आपल्याच धुंदीत चाललो होतो. धुंदी (?) आली कि जे नको व्हायला पाहीजे तेच होते.

मी ही सिग्नल तोडला आणि ते हि नसे थोडके म्हणुन पोलिसाच्या समोरुन गेलो. मामाने घरले...चावी काढली व लांब कोपर्‍यातील पावतीवाल्या मामा कडे जा म्हणुन सांगितले. माझी धुंदी उतरुन मी जमिनीवर आलो व त्याच जमिनीवर चालत त्या पावतीवाल्या मामा कडे गेलो. निमुटपणे पावती फाडली.

बर आता कुठलाही शहाणा माणुस निमुट चावी घेइल व मार्गस्थ होइल पण विनाशकाले विपरीत बुध्दी म्हणतात ते खरेच आहे. मी पुन्हा मला ज्याने पकडले (?) त्या मामाकडे जावुन मी विचारले "काय हो साहेब माझ्या बरोबर त्या वोल्वो ने ही सिग्नल तोडला त्याला का नाही पकडले.

मामा: तो माझा जावई आहे, तुला काही प्रोब्लेम?

मी : (नम्रपणे) मला पण जावई करुन घ्या ना साहेब !!!

मामा: #@$%#$##$


आणि ते श्लोक ऐकुन मी ओफिस ला पळालो.



-अभी

Tuesday, November 3, 2009

मित्र आणि मैत्रिणींनो...

मित्र आणि मैत्रिणींनो,

सध्या मी प्रचंड व्यस्त झालो आहे कारण एक नविन काम सुरु झाले आहे.
पण जरा निवांत झालो की लगेच मी तुमच्या भेटीला येइल.
पण तुम्ही माझी वाट जरुर पहा.

आपला नम्र,
अभि

Tuesday, October 20, 2009

मालकंस : एक वर्ष संघर्षाचे

आपल्या भावना व्यक्त करता येणे ही मानवाला लाभलेली सर्वात मोठी देणगी आहे असे मी मानतो.प्रत्येक माणुस हा निरनिराळ्या मार्गाने स्वतः व्यक्त करत असतो

कोणी गद्य कोणी पद्य,
कोणी भेटुन कोणी फोनवरुन,
कोणी उपहासातुन कोणी समजुतदारपणे
कोणी पुणेरी शाब्दिक कोट्यातुन
कोणी कोल्हापुरी रांगड्या शिव्यातुन
कोणी कानाखाळी वाजवून
कोणी गालावरुन हात फिरवुन
कोणी स्तब्ध होऊन
कोणी पेटुन उठुन
कोणी एकट टाकुन निघुन जात
कोणी मायेने जवळ घेत
कोणी तारुण्याच्या धुंदीतुन
कोणी वॄध्द्त्वाच्या सुरुकुत्यातुन
कोणी पावसासारखे भिजवून टाकत
कोणी उन्हाळ्यासारखे करपुन टाकत

व्यक्त होत रहातात
आपला अंश मागे सोडत रहातात
काही अंश टिकतात
काही विरतात



बदलत्या जगाने ब्लोग हे माध्यम आपल्या दिले आणि त्याचा पुरेपुर वापर आपण केला पाहीजे. आपल्याला जागतिक पातळीवरील संवादामधे भाग घेण्याचे माध्यम ब्लोग द्वारे उपलब्ध झाले आहे.या आंतर जालावरील सर्व ब्लोगर्स ला माझा मानाचा मुजरा - तुम्ही करत असलेल्या खटाटोपामुळे आपल्या ही नकळत आपण मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेत आहोत तिच्या या रुपातील एक बखर बनवत आहोत.

आज आपला ब्लोग "मालकंस" एक वर्षाचा झाला. मी त्याला वाढदिवस नाही म्हटणार कारण पोस्ट ची संख्या हेच केवळ वाढले आहे. अजुनही इथे चांगले लिहिण्याचा संघर्ष चालु आहे.
आणि त्यात आपणासारख्या गुणीवंतांच्या प्रेमामूळे मी अजुनही टिकून आहे.

इथे असलेल्या ब्लोगर्स मुळे खुप काही शिकायला मिळाले कुठल्या गोष्टीमधे काय पहावे ही सौंदर्य द्रुष्टी विकसित झाली. समविचारी लोक भेटले. शब्दबंध च्या माध्यमातून निरनिराळ्या देशातील पण आपल्या मातीतल्या मराठी जनांशी गप्पा मारता आल्या, खुप शिकायला मिळाले.

असाच आपला लोभ आपल्या ब्लोग वर कायम असावा ही दटावणी :)

आपला नम्र,
अभि

Monday, October 19, 2009

दिवाळी पहाट मैफल : पंडित हरिप्रसाद चौरसिया


आज पहाटे पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरी वादन ऐकण्याचे भाग्य प्राप्त झाले आणि खरी दिवाळी साजरी झाली.

शरिरातील सर्व विकार निघुन गेल्यासारखे वाटत आहे.

पंडितजींनी प्रभातेश्वरी या रागापासुन सुरुवात केली. त्यानंतर त्यानी ललित रागातिल एक रचना सादर केलि. कार्यक्रमाची सांगता "ओम जय जगदिश हरे" या भजनाने केली.

पं विजय घाटे यांचे तबला वादन बघायला (?) मजा आली.

खुप काही व्यक्त करायचे आहे. आता एवढेच.....

लोकसत्ता मधे पंडितजींवर एक सुंदर लेख आला आहे तो खाली देत आहे. मुळ लेख वाचण्यासाठी येथे टिचकी द्या.

वडील पहिलवान असले तरी त्यात मन रमण्याची शक्यता नाही. मुलाने आपलीच कला आत्मसात करावी आणि आयुष्य सार्थकी लावावे, अशी इच्छा असली, तरी केवळ वडिलांच्या समाधानासाठी तालमीत जाणाऱ्या हरिप्रसाद चौरसिया यांचे खरे प्रेम व्यायामापेक्षा सुरांवरच होते. त्यामुळे वयाच्या पंधराव्या वर्षांपासून त्यांनी बनारसच्या पंडित राजाराम यांच्याकडे गाणे शिकायला सुरुवात केली. नंतर काही दिवसांतच पंडित भोलानाथ यांचे बासरीवादन ऐकून त्यांचा जीव त्या वाद्यावर जडला आणि नंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. ओरिसातील ‘अक्षय प्रतिष्ठान’चा मानाचा ‘अक्षय सन्मान’ पंडित हरिप्रसाद यांना जाहीर झाला, तो त्यांच्या आयुष्यभरातील कामगिरीबद्दल! त्यांचे मनापासून अभिनंदन अशासाठी करायचे, की गेल्या काही वर्षांत स्व. पन्नालाल घोष यांच्यानंतर स्वत:च्या प्रतिभेने एखाद्या वाद्यावर हुकमत प्राप्त करून ते अतिशय लोकप्रिय करण्याची जादुई किमया दीर्घकाळ त्यांनी केली आहे. वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच त्यांना आकाशवाणीमध्ये नोकरी मिळाली आणि त्यांनी आपले बासरीवादनाचे तंत्र विकसित करायला सुरुवात केली. उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांची कन्या अन्नपूर्णादेवी यांच्याकडून त्यांना काही काळ मार्गदर्शन मिळाले. घरात संगीताची कोणतीही परंपरा नसताना जागतिक दर्जाचा कलावंत होण्यासाठी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी जे अपार कष्ट घेतले आहेत, ते अतुलनीय आहेत. ‘सेल्फ मेड मॅन’ असे वर्णन करता येऊ शकेल, अशा अगदी विरळा कलावंतांपैकी चौरसिया हे एक आहेत. परंपरा आणि नवता यांचे एक अनोखे मिश्रण असणाऱ्या या कलावंताने बासरी या वाद्यावर एवढे प्रभुत्व मिळवले आहे, की साऱ्यांनी अचंबित व्हावे. भारतच नव्हे तर साऱ्या जगात ज्ञात असलेले संगीताची निर्मिती करणारे पहिले वाद्य म्हणून बासरी (फ्लूट)ओळखली जाते. इसवी सनपूर्व चार हजार वर्षे आधी इजिप्तमध्ये फ्लूट हे वाद्य सापडल्याचा पुरावा सापडतो. भारतीय संस्कृतीत तर बासरी या वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले, ते कृष्णामुळे! त्याची मुरली ही भारतीय संस्कृतीमधील एक फार महत्त्वाची खूण ठरली. मानवाला संगीत या गोष्टीचे भान आले असेलच तर ते निसर्गत: व्यक्त होत असलेल्या नादसातत्यामुळे! हे नादसातत्य त्याला कदाचित वेळूच्या बनात ऐकू आले असेल. पोकळ अशा बांबूमधून गळय़ातून निघणाऱ्या सात स्वरांसारखेच तंतोतंत स्वर निर्माण होऊ शकतात, हा मानवासाठी एक फार मोठा चमत्कार होता. गळय़ातून व्यक्त होणाऱ्या संगीताशी त्यामुळेच बासरी आपले नाते सांगते आणि ती गळय़ाप्रमाणेच गाऊ लागते. बासरीवादनाची स्वत:ची खास शैली निर्माण करून या क्षेत्रात स्वत:चे घराणे स्थापन करण्याची क्षमता असणारे हरिप्रसाद चौरसिया हे केवळ अभिजात संगीतातच रमले नाहीत, तर त्यांनी भारतीय चित्रपट संगीत अनेक अर्थानी समृद्ध केले. अनेक ध्वनिमुद्रिकांमध्ये त्यांनी बासरीवर संगत तर केली आहेच, परंतु ‘सिलसिला’सारख्या चित्रपटाला संगीत देताना आपली वेगळी ओळखही सिद्ध केली. वयाच्या तिसाव्या वर्षी चौरसिया यांनी पं. शिवकुमार शर्मा (संतूर) आणि पं. ब्रिजभूषण काब्रा (गिटार) यांच्याबरोबर सादर केलेला ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा अल्बम आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंपरेशी आपले नाते घट्ट करत असतानाच पाश्चात्त्य संगीताशीही नवे नाते जोडण्यासाठी चौरसिया यांच्याकडे कमालीची प्रतिभा आहे. त्यामुळेच ते जगातील एक श्रेष्ठ बासरीवादक म्हणून ओळखले जातात. (रॉटरडॅम म्युझिक कॉन्झर्वेटरीच्या जागतिक संगीत विभागाचे ते प्रमुखही आहेत.) पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, कोणार्क सन्मान, यशभारती सन्मान मिळाल्यानंतरही ते आजही आपली सर्जनशीलता सतत ताजी ठेवण्याचा जो प्रयत्न करतात. मुंबईत त्यांनी स्थापन केलेल्या गुरुकुलात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आजही मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी असते. वडिलांच्या प्रेमाखातर तालमीत जाऊन पहिलवान होता आले नसले तरी त्यामुळेच आज वयाच्या सत्तरीतही दमसास टिकवून कला सादर करता येते आहे, याचे समाधान जेवढे त्यांना आहे, तेवढेच जगातील रसिकांनाही आहे.


-अभी

Saturday, October 17, 2009

दिवाळी पहाट मैफल : पंडित अजय चक्रवर्ती


सवाई गंधर्व २००८ मधे पंडितजींचे गाणे ऐकल्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांचे गाणे ऐकण्याचे भाग्य मला लाभले. पटियाळा घराण्याच्या या जगप्रसिध्द गायकाला गुरु लाभले ते हि महान, उस्ताद मुनावर अली ख़ान. सवाई गंधर्व मधे पहिल्यांदा त्यांचे गाणे ऐकले आणि तेंव्हा पासुन त्यांच्या गाण्याचा ध्यास लागला. गदर मधिल "आन मिलो सजना" हि सुप्रसिध्द ठुमरी त्यांनीच गायली आहे.

त्यांची मुलगी "कौशिकी चक्रवर्ती हि वडिलांचा पावलावर पाय ठेउन शास्त्रिय संगितात नाव कमवित आहेत.

तर आजची मैफिल हि खास होणार हे माहित होतेच.

मैफिलीची सुरुवात पंडितजींनी "भीमपलास तोडी (विलबिंत)" या रागाने सुरु केली. या रागाच्या शेवटी अचानक लाईट गेल्या मुळे साउंड सिस्टम बंद झाली पण पंडित जी ही थांबले नाही व श्रोत्यांनीही गोंध़ळ घातला नाही. माइक शिवाय पंडितजींचा आवाज ऐकण्याची मजाच और होती.

त्यानंतर त्यांनी अहिर ललित रागातील द्रुपद बंदिश सादर केली. तिचे बोल होते

"नीलकमल पराग सुरवित,
काहे धरत अधर बीच बन्सी
सुन, हरने प्राण ही"

त्यानंतर त्यांनी ठुमरी सादर केली. त्याचे बोल होते:

"साजन तुम मत जानियो,
के तुम बिन बिछडे मोरे चैन,
जैसै वन की सुन गत होगी,
तडपत बिती रात"

आणि लगेच त्यांनी सुप्रसिध्द ठुमरी "आये ना बालम , का करु सजनि" गायली. उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्या आवाजात हिच ठुमरी ऐकायची असेल तर येथे टिचकी द्या.

मैफिलीचा शेवट त्यांनी भैरवीतील भजन गाऊन केली.

"द्वार खोलकर बैठा हु,
तुम आ जाना भगवान.
तेरे बिना मन मंदीर मेरा,
है पडा सुनसान,
तुम आ जाना भगवान.

रित पुजा की याद नही है,
क्या चढाऊ प्रसाद नही है
तुम दाता मै हु भिकारी,
क्या देउ बलिदान
तुम आ जाना भगवान.

धन की प्याद नही है,
दरस मिले बस आस यही है
तनिक भक्तिसे भक्त की,
नाथ हो जाये पहचान
तुम आ जाना भगवान.


आणि हे भजन संपतानाच त्यानी सवाई गंधर्व मधे गाइलेल शिव-स्तुती श्लोक म्हटला आणि लोक मी अजुनही त्यातच आहे.

दैवी अनुभव....



आणि मजेची गोष्ट म्हणजे मी पंडितजींच्या भावमुद्रा कँमेर्‍यामधे बंदिस्त करण्यात यशस्वी झालो. आणि त्यांची स्वाक्षरी घेण्यात सुध्दा.....

आयुष्यामधे अजुन एका दर्जेदार आठवणीची भर पडली. वसंतराव देशपांडे मेमोरीअल फाऊंडेशन चे असा कार्यक्रम आयोजीत केल्या बद्द्ल खुप खुप आभार!!!

आता उद्या देवकी पंडीत यांची सारस बागेत मैफल आहे त्याला जातो व उद्या तुम्हाला सांगतो तिथे काय काय झाले.

-अभी

Saturday, October 10, 2009

समांतर जीवन

आज माझ्याच ब्लॉग वरिल "समांतर" हा लेख वाचताना मला सुनिता देशपांडे यांनी लिहीलेल्या "समांतर जीवन" या पुस्तकाची आठवण झाली. पटकन कपाटातुन ते पुस्तक शोधले आणि चाळु लागलो.
१९९० साली सुनिताताईंना त्यांचे स्नेही डॉ. रमेश गांगोली यांनी फिलिस रोझ यांचे "पॉरलल लाइव्हस" हे पुस्तक वाचायला दिले. त्या पुस्तकाची ओळख म्हणुन सुनिताताईंनी काही लेख लिहिले त्याचा लेख संग्रह म्हणजे हे पुस्तक.

याच पुस्तकाच्या शेवटच्या पानावर या पुस्तकाबाबत छान लिहिले आहे.

"या पाच जोड्प्यांची निवड करतानाही लेखिकेने ती एकाच साच्यातली निवडलेली नाहीत. उदाहरणार्थ डिकन्स आणि जार्ज एलियट हे कादंबरीकार, तर कार्लाइल, रस्किन आणि मिल हे सामाजिक विचारवंत. जार्ज एलिएट आणि मिल हे सुधारक मतांचे तर कार्लाइल डिकन्स आणि रस्किन हे पुर्वदिव्याच्या कल्पनेत रमणारे परंपरावादी. यांतल्या काहींची वैवाहीक जीवने सुखी म्हणता येतील तर काहींची दु:खी. काही भरपुर मुलेबाळे असणारे तर काही जन्मभर एकमेकांना फक्त बॉद्धिक सोबत करत, विषयवासनेपेक्षा काव्य-शास्त्र विनोदातच रस घेउन संसारात मुलाबाळांना स्थान न देणारे. काहींचे जीवन सदैव अस्थिर तर काहींचे भक्कम पायावर ताठ उभे.

अशी हि निवड भिन्न भिन्न असल्याने या चित्रणात विविधता तर आहेच, पण हे सगळे लेखकच निवडल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या हातचा भरपुर पुरावाही आधाराला आहे. लग्न ही संस्थाच जर बाद केली तर एका विशिष्ठ चौकटीतल स्त्री-पुरुषांच मीलन आणि संघर्ष, त्या विशिष्ठ काळातल्या एकत्र जीवनातल्या प्रत्येक घटनेबद्दलच्या प्रतिक्रियांतल साम्य आणि भेद, सुख-दुखः, हा सारा मानवी खेळ पाहताच येणार नाही. खेळ म्हटला की त्याला नियम आले, चौकट आली, बंधने आली. आणि खेळायला तर हवे, पण या बंधनाचा जाच नको म्हणुन पळवाटा शोधणे आणि आरडाओरडा करणे, नाराजी व्यक्त करणेही आले. त्या त्या खेळगड्याच्या वाटयाला आलेले, प्रत्यक्ष भोगावे लागलेले सुखदुखा:चे आणि जय-पराजयाचे क्षण हे त्याच्या त्याच्या पुरते.

ही गंमत पाहायला मुद्दाम वेळ काढुन जमणार्‍या प्रेक्षकांना हा सामना बहुरंगीच पाहायला आवडतो. अशा अनेक खेळांच्या आठवणी हा त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचा ठेवा असतो."

पुस्तकाचे नाव : समांतर जीवन
लेखिका : सुनिता देशपांडे


-अभी

Friday, October 9, 2009

लाज!!!

तुमचे बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही.


#$#%##$, काल १६ पोलिस शहिद झाले, त्याबद्दल कोणी श्रधांजली हि वाहिली नाही. कुठे बातमीही नाही. लाज वाटते आहे मला अशा नेत्यांच्या राज्यात.

गडचिरोलि तिथे ह्या घटना नेहमीच्याच आहेत असे म्हणुन नाही चालणार. तिथे अफगाणिस्तानात भारतिय दुतावासावर तालिबान चा हल्ला इथे नक्शलवाद्यांचा हल्ला. मी असे वाचले कि नक्शलवाद्यांकडे बुलेट्प्रुफ जॉकेट होती आणि पोलिसांकडे नव्हती. अरे काय !!! मस्करी चालू आहे कि काय?

लाज!!!


-अभी

इस्किलार

पण या शब्दांनी तो आज फार अस्वस्थ झाला. त्याने तुटकपणे विचारले, "पण आपल्यासारख्याच माणसांची खरेदी विक्री करुन पोट जाळण्यात कमीपणा नाही का?" "तू हा प्रश्र्न प्रथमच विचारणार हे मला माहित होते व त्याच उत्तराची मी तयारी करत होतो." व्यापारी शांत पणे म्हणाला.

" शिवाय, तो प्रश्र्न विचारणारा तूच काही पहिला नाहीस. इतर वेळी मी ह्सुन गप्प रहात असे. कारण प्रश्र्न काय, - कोणीही मुर्ख माणुस विचारु शकतो. पण ज्यांच्या प्रश्र्नांना उत्तरे द्यावीत अशी लायकी असणारा हजार लाखात एकटाच असतो. त्यात का बरे कमीपणा वाटावा? मेंढ्या, घोडे, उंट यांचा व्यापार करण्यात शरम नाही, तर माणसांचाच व्यापार करण्यात कसली शरम आली आहे? हे प्राणी अगदी शुद्र आहेत, माणुस तेवढा उच्च आहे, हे तुला कोणी सांगितले? घोड माणसापणे कृतघ्न नाही. उंट वाद्ळाच्या प्रसंगी मालकाला टाकत नाही. स्वतःची स्त्री देवुन त्या जनावरांपैकी कोणीही मोठेपणा मिरवत नाही. माणुस जेवढा खालच्या पातळीवर उतरु शकतो, तेवढे उतरणारे जनावर तुला माहित आहे? शिवाय एखाद्याला हातपाय आहेत, तो पोट भरतो, तो प्रजा निर्माण करतो, केवळ एवढ्यामुळेच का तो तुझ्या बरोबरीचा ठरतो? मग तर तु वेडा आहेस. काही माणसे खास तुझ्या बरोबरीची नाहीत, आणि हेही लक्षात ठेव, तु स्वतः काही माणसांच्या बरोबरीचा नाहीस. सर्व माणसांत ज्या गोष्टी समान आहेत, त्या फक्त माणसांतच आहेत असे नाही. त्या सगळ्या प्राण्यांतच आहेत. पण ज्या गोष्टीमुळे माणुस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, त्यांच्याबाबत समानता असणे केवळ अशक्य आहे. आणि गुलामगिरी तु समजतोस तेवढी दुर्मिळ नाही. धर्मसंस्थापक काहिही खुळचट बोलला तरी ते शब्द गळ्यात अडकवुन तुम्ही हजारोंनी गुलाम होता, हजारो वर्षे गुलाम रहाता, आणि विशेष म्हणजे ही गुलामगिरी जेवढी प्राचिन, तेवढा तुम्हांला तिचा अभिमान वाटतो. तुझा सम्राट सांगेल त्या देशाविरुध्द तुम्ही आंधळेपणाने तलवार उगारता!! अरे तु या देशात जन्मला असतास तर येथल्यासारखाच पोशाख करायच्या साध्या गुलामगिरीतुन सुटायला तुला फार धैर्य दाखवावे लागले असते. काही गुलामांना तांड्यातांड्याने निरनिराळ्या देशात विकले जातात. बाकिचे आपल्या घरात राहुनच गुलाम म्हणुन मरतात."

पुस्तकाचे नाव : रमलखुणा
लेखक : जी ए कुलकर्णी
कथा : इस्किलार


-अभी

Friday, October 2, 2009

किशोरीताई आमोणकरांची मैफिल


किशोरीताई आमोणकरांची मैफिल उद्या संध्याकाळी आहे. कोजागरी पौर्णिमेला (शनिवार, ता. ३ ऑक्‍टोबर २००९) पूर्ण चंद्रासह, शीतल चांदण्यात सिद्धी गार्डन, म्हात्रे पुलाजवळ सायंकाळी ७ वाजता ही मैफल रंगणार आहे.

मी जाणार होतो पण आयत्यावेळी माझे अलिबाग ला जायचे ठरले. :(

माझ्याकडे किशोरीताईंच्या कार्यक्रमाचे एक तिकिट आहे कुणाला हवे असल्यास जरुर सांगावे.

टिप : तिकिट विनामुल्य दिले जाईल. :)

-अभी

Wednesday, September 23, 2009

पुस्तक-भिशी

कंपनीमधे ४ ते ४.३० हा वेळ म्हणजे आमच्या सर्जनशीलतेचा वेळ असतो. आम्ही सर्वजण दररोज ४ वाजता चहा पिण्यासाठी कंटिनमधे जातो. बर्‍याच दिवसांपासुन आमचा विचार चालु होता कि समविचारी लोकांना (म्हणजे जे लोक वेडे आहेत उर्फ कामातुन गेलेले) कसे एकत्र आणता येइल. तर या विचारातूनच भिशीची कल्पना पुढे आली.

बर्‍याच लोकांना भिशी म्हणजे काय हे माहीत असेल तरी पुन्हा एकदा सांगतो. भिशी म्हणजे महिन्याच्या एका तारखेला एकत्र जमायचे व एक ठरलेली रक्कम गोळा करायची व ती एका सभासदाला द्यायची. आणि त्या सभासदाचे नाव चिठ्ठी टाकुन किंवा अन्य अभिनव पद्धतीने (?) काढायचे.

पण मग विचार केला कि या कल्पनेमधे काही नविन नाही मग यातुनच पुस्तक-भिशी ची कल्पना जन्माला आली. यामधे प्रत्येक सभासद एक पुस्तक घेउन येणार व ते दुसर्‍या सभासदाला देणार म्हणजे १२ सभासद असतिल तर १२ वेळा ही प्रत्येक महिन्यात ही पुस्तकांची अदलाबद्ल होणार व सर्व सभासदांची सर्व पुस्तके वाचून झाली पुन्हा नवीन पुस्तकांच्या संचाने पुस्तक्-भिशी चालु करायची.

आणि यामुळे शहाणी लोके येणार नाही फक्त वेडिच लोके येतिल्...

त्यामुळे पुस्तकांची पहिली अदलाबद्ल तर झाली आहे,

आता पाहुया कुठ्ली कुठ्ली पुस्तके वाचनात येतिल ते....

-अभि

Tuesday, September 22, 2009

उदास झाले सूर, अंतरी उठले किती काहूर ! संवादिनी क्षणि मूक जाहली. साधक गेला दूर!

आज मित्राशी बोलताना सवाई गंधर्व चा विषय निघाला. पहाता पहाता डिसेंबर येउन पोहोचला...अजुन मागच्या आठवणींचा ओलेपणा आहे. आमच्या गप्पा निवांत चालू होत्या आणि तेवढ्यात तो म्हणाला "अरे तुला कळले का?, अप्पा गेले". मी सून्न झालो.

अप्पा जळगावकर आणि भिमण्णा हे जणु समीकरणच बनले होते एके काळी. हार्मोनियम किंवा संवादिनी ला महत्त्व आले ते अप्पा जळगावकरांमुळेच आले. ओल इंडिया रेडीओ ने संवदिनी हे परिपुर्ण वाद्य नाही असे म्हणुन कार्यक्रमामधुन संवादिनीला हद्द्पार केले. यामुळे संवादिनी वादकांच्या एका पुर्ण पिढीचे नुकसान झाले. अप्पा म्हणायचे यात त्या वादकांचाच दोष आहे. ते वादक स्वतः ची संवदिनी न घेता जायचे त्यामुळे न लावलेल्या संवादिनी वर त्यांना कार्यक्रम करावा लागायचा त्यामुळे सुर दुषितच यायचा. अप्पा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला कटाक्षाने स्वत:ची संवादिनी घेउन जायचे. आज पर्यन्त संवादिनी वाद्काला कधिच न मिळालेला "संगित नाट्य अकादमी पुरस्कार अप्पांना मिळाला.

अप्पांचा जन्म जालन्यातील जळगाव या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात १ जानेवारी १९२२ रोजी झाला. त्यांचे खरे नाव "सखाराम प्रभाकर जळगावकर असे होते पण लोक त्याना अप्पा म्हणूनच ओलखत. अप्पा फक्त पाचवी पर्यन्त शिकले. त्यांच्या जालन्याच्या शाळेत पाचवी नंतर उर्दु मेडियम असल्या मुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेतून काढुन गाणे शिकायला ध्रुपद गायक बालक्रुष्ण बुवा चिखलीकर यांच्या कडे पाठवले. पण गळा फुटल्यामुळे त्यांचा आवाज फाटु लागल्यामुळे त्यांनी गायन सोडून संवादिनी हाती धरली व पुढचा सर्व इतिहास आहे.

१९४७ साली अप्पा हे किर्तनकार मथुताई फडके यांच्या बरोबर पुण्यात आले. पुण्यात ते तबलावादक जोशी यांना भेटलॅ. पुढे जोशींनी त्यांची ओळख माणिक वर्माशी करुन दिली. माणिक वर्मांना अप्पांचे वादन फारच आवडले व तिथुन पुढे अप्पांनी कधी मागे वळुन पाहिलेच नाही. अप्पांनी साथ दिलेल्या वादकांमधे भारतातील जवळ जवळ सर्व थोर गायक व वादक आहेत. कोणत्याही कलावंताला त्याच्या प्रतिभेला साद घालणारा संगतकार हवा असतो. अनेक मोठे कलावंत प्रत्येक मैफलीत आपले स्वत:चे संगतकार नेत असतात, याचे कारण हेच होते. आणि अप्पांची हिच खासियत होती. अप्पांनी बडे गुलामअली खान, अमिर खान, भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, रोशन आरा बेगम, गंगुबाई हनगल, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, किशोरी अमोणकर आणि पंडित जसराज यांना साथ दिली आहेत. अप्पांनी नॄत्य आणि तबलावादन या दोन्हिंना साथ दिली आहे. थिरकवा खान, अल्लारख्खा खान, किशन महाराज, समता प्रसाद आणि झाकिर हुसेन आणि न्रुत्यामधे रोहिणी भाटे, पंडित बिरजु महाराज यांनाही साथ दिली आहे.

अप्पांचे लय आणि ताल यावर जबरदस्त प्रभुत्व होते. कित्येक गायकांना भर मैफिलीत अप्पांना दाद देण्याचा मोह आवरला नाही. विख्यात सतारवादक रवि शंकर एकदा म्हणाले होते "अप्पा गायकाची नाडी ओळखुन साथ देतात". तसे पाहिले तर संवादिनी वादन म्हणजे तारेवरची कसरतच... मुख्य गायकाला झाकोळायचेही नाही आणि आपली कलाची सर्जनशीलताही दाखवायची. अप्पा हे लिलया करत.

पण आता फक्त आठवणी....

या सवाई गंधर्व महोत्सवात तुमची कमी जाणवत राहील......

-अभी

Monday, September 21, 2009

समांतर

काल "समांतर" पाहिला आणि बर्‍याच दिवसांनी एक दर्जेदार चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले.

शर्मिला टागोर आणि अमोल पालेकर ७० च्या दशकात गाजलेल्या "मदर" (१९८५) या बंगाली चित्रपटानंतर पुन्हा एकत्र आले आहेत. अमोल पालेकर सुद्धा त्यांच्या "अनकही" या चित्रपटानंतर पुन्हा एकदा अभिनेता म्हणुन प्रेक्षकांच्या समोर आले आहेत्....जवळ जवळ २४ वर्षानंतर.

मी काही वेगळे सांगण्याची गरज नाही पण अमोल पालेकर यांचा अभिनय आणि दिग्दर्शन दोन्हीही उच्च दर्जाचे आहेत.

अमोल पालेकर हे खरच एक अवलिया माणुस. प्रसिध्दिच्या शिखरावर राहुनही त्यांनी कधी चाकोरीतील वाट स्विकारली नाही, अभिनेता म्हणुन किंवा दिग्दर्शक म्हणुन्...त्यांचे चित्रपट नेहमीच चाकोरीबाहेरील ठरले आहेत. आणि "समांतर" ही त्याला अपवाद नाही. अमोल पालेकर आणि शर्मिला टागोर जबरी कोंबिनेशन्...दोघेही कसलेले...

मला वाटले होते कि शर्मिला टागोर चे मराठी उच्चार कसे असतिल पण अमोल पालेकर यांनी चित्रपटाच्या सुरुवातीलाच सर्व संवादांचे रेकोर्डिंग शर्मिला टागोर यांना पाठवुन दिले त्यामुळे शर्मिला टागोर यांच्या लिप मुव्हमेंट अगदी चपखल बसले आहेत. त्यांनी आवाज कुणाचा घेतला आहे ते माहित नाही पण तो अजुन चांगला घेता आला असता. तसेच एडिटींग मधिल बर्‍याच चुका टाळु शकणार्‍या आहेत. सिनेमॅटोग्राफी वाखाणण्यासारखी आहे.

केशव वझे आणि क्षमा साने यांच्या अधुर्‍या व हरवलेल्या पण समांतर राहीलेल्या आयुष्यावरील हा चित्रपट आहे. बर्‍याच वेळा आपण गाडीतुन प्रवास करताना अनुभवले असेल कि कधी कधी आपल्या गाडीला समांतर राहुन एक लेन सोडुन एक गाडी चालली आहे, मधल्या लेन मधिल गाड्यांमुळे ती गाडी मधेच नाहीशी होते आणि पुन्हा थोड्या वेळानॅ दिसते...

आणि आपण विचार करत असतो कि त्या गाडिने रस्ता बदलला असेल किंवा त्या गाडिचे डेस्टिनेशन वेगळे असेल्...अगदी याच धर्तिवर "समांतर" ची कथा आकार घेते.

केशव प्रथम खुप कृथार्थ वाटतो पण हळु हळु त्याचे एकाकीपण कळु लागते, एखाद्या डोहासारखे...तुंबलेल्या डोहासारखे. बाहेरुन वाटते कि किती स्तब्ध अन खोल डोह आहे, किती निश्चल आहे. कितीही वलये पचवण्याची ताकद असेल यात. पण बर्‍याच लोकांना माहित नसते कि एक वाट किंवा एक पाट या डोहाचे डोहपण काढुन घेउन त्याला ही वाहतं करु शकते, आणि ती वाट म्हणजे क्षमा...केशवची क्षमा. पण ती वाट डोहामधुन कधीच जात नाही....ती समांतरच वहात रहाते.

समांतर चे कला-दिग्दर्शन ही वाखाणण्याजोगे आहे. केशवच्या खोलीतिल रिकाम्या फ्रेम त्याचे एकटेपण दर्शवितात तर त्याच्या घरातील एक गुढ शिल्प त्याच्या आणि क्षमेच्या प्रेमाचे प्रतिक बनते. घरातील लोकांनी त्या शिल्पाचा अर्थ विचारल्यावर केशवचे ठरलेले उत्तर असायचे "ज्याला जो अर्थ लागेल तोच याचा अर्थ." सर्वांना ते शिल्प पुर्ण वाटत असते पण जेंव्हा त्या शिल्पाचा एक भाग क्षमाच्या घरी सापडतो तेंव्हा केशवची मुलगी म्हणते "आम्ही त्या शिल्पाला पुर्णच समजत होतो, कधी कळलेच नाही कि ते शिल्प अपुर्ण आहे".

"समांतर" मधिल सिसीफस चा उल्लेखही अर्थपुर्ण आहे, सिसीफस हा प्राचिन ग्रीक राजा होते ज्याला एक अतिशय कंटाळवाणी शिक्षा झालेली असते, त्याला एक गोल खडक एका घसरड्या पहाडावर चढवायचा असतो, पण तो गोल खड्क मंतरलेला असल्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी तो शेवटी घरंगळत पायथ्याशी येउन पडायचा. आणि युगे युगे सिसीफसला ही शिक्षा भोगणे अनिवार्य होते.

इच्छामरण किंवा युथांशिया याबद्द्ल फारच गहन विचार मांड्ले आहेत. केशव चे इच्छामरण कसे योग्य आहे याचे समर्थन मनाला पटनारे आहे. "केवळ मरण येत नाही म्हणुन जगणे मला पटत नाही" हा संवाद मनाला कुठेतरी अंतर्मुख करतात. जी ए कुलकर्णी यांचे विचार असेच काहीशे होते. जगण्याला काही तरी हेतु हवा, जर तो हेतु नसेल तर ते जगणे आणि म्रुत्यु यात काही एक फरक नाही. केशव चा स्विझर्लंड सरकार शी झालेला पत्र व्यवहार आततायी वाटत नाही. ( जगात फक्त स्विझर्लंड मधे इच्छामरण कायदेशीर आहे.)

हा चित्रपट मला आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यातिल कोलकत्याचे चित्रिकरण. क्षमा साने कोलकत्यातील एक मातीचे शिल्प बनवणारी कलाकार दाखवली आहे. कोलकत्याची ती गंगेच्या तीरावरील सकाळ, शंख अन ढोलकीच्या आवाजातील देविच्या आरत्या सर्वच फार नोस्ट्याल्जिक करतात. नदितील ती संथ वेगाने आपल्याही नकळत पुढे जाणारी नाव केशव आणि क्षमेच्या आयुष्याचे प्रतिक वाटते. क्षमाच्या घराचा तो टिपीकल बंगाली बाज मनाला हुर हुर लावुन जातो. त्याच घरामधील क्षमाचे आणि केशव चे व्हायोलीन वादन खुपच बोलके वाटते.

अजुन खुप भावना आहे पण काय काय लिहु....

शेवटी काय तर ज्यांच्या संवेदनशीलतेला अजुन बुरशी लागली नाही त्यांनी हा चित्रपट जरुर पहावा.

समांतर:
अभिनय : अमोल पालेकर, समिर धर्माधिकारी, ऐश्वर्या नारकर, राधिका आपटे, संदीप मेहता, ऋषी देशपा.डे, मकरंद देशपांडे, वंदना गुप्ते
कथा, पटकथा, संवाद : संध्या गोखले
गीतलेखन : किशोर कदम (सॉमित्र)
संगीत : आनंद मोडक

-अभी

Wednesday, September 9, 2009

मिरज दंगल - इथे धर्म कुठे आला?

गणेश विसर्जनाच्या पण आधि सुरु झालेल्या या दंगलिचे कारण ऐकुन मन विषण्ण झाले. काही जणांना माहित नसेल म्हणुन पुन्हा सांगतो. कि मिरजेत एका गणेश मंडळाने एका कमानिवर शिवाजी महाराज अफजलखानाचा वध करतानाचे चित्र लावले होते. त्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला. बहुतेक त्यांच्या मते अफजलखान हा फार मोठा धर्मगुरु होता. असो.
पण इथे धर्म कुठे आला? शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यातिल संघर्ष हा चांगल्या आणि वाईट प्रव्रुत्ति मधिल संघर्ष होता. या घटनेचे वर्णन इतिहासामधे दिलेले आहे, मग भावना दुखावण्याचा प्रश्नच कुठे येतो.
इथे राज्यकर्त्यांनी ठाम भुमिका घ्यायची गरज आहे. हा प्रश्न धार्मिक नाही. इथे इतिहासाचा दाखला देवुन जे चुक आहे त्याचे खंड्न केले पाहिजे अन्यथा भविष्यात अनर्थ घडु शकतो.
या घटनेबद्दलचे आपले मत जरूर कळवा.

जय हिंद!!!