छत्रपती शिवाजी महाराज. लहानपणी शिवाजी महाराजांची पहिली ओळख माझ्या आजीने करुन दिली ती म्हणजे "शिवाजी म्हणतो" या खेळातुन. त्यानंतर पाठ्यपुस्तकातुन शिवाजी महाराजांची ओळख निर्माण झाली पण भारावलो नव्हतो कारण त्यांना मी समजलो नव्हतो. शिवाजी महाराजांना समजणे म्हणजे त्यांनी ज्या परिस्थीतीत स्वराज्य स्थापन केले ती परिस्थीती समजणे. जीवनातील छोट्यामोठ्या समस्यातुन हैराण होणारे आपण, जेंव्हा छत्रपतींच्या चरित्रातील घडामोडी पाहतो, समजतो तेंव्हा नकळत आपणही त्या तेजोबलात नखशिखांत न्हाऊन निघतो.
आजीकडुन, प्राथमिक आणि पाचवी सहावीमधल्या गुरुजनांकडुन शिवाजीमहाराजांबद्दल बरेच काही कळले, पण भारावलो नव्हतो. तेंव्हा गडांवरही गेलो, पण सहल म्हणुन, पाचवी पर्यंत माझे सिंहगड, प्रतापगड, शिवनेरी वैगेरे शालेय सहलींचे गड झाले होते. पण मी खराखुरा भारावलो, शेटे सरांचा पहिला इतिहासाचा तास झाल्यावर. मी शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाने संपुर्ण भारावुन गेलो. आणि शेटेसरांबद्द्ल आदर वाढला. हे असे गुरुजन योग्य वयात मिळणे फार महत्त्वाचे आहे. बर्याच वेळा कुठे-कधी आणि कशासाठी भारावुन जायचे हे अजाणत्या वयात योग्य व्यक्तीकडुन कळणे हेच आयुष्य घडवायला मदत करते. माझ्याबाबतीत तरी हे सत्य आहे. आईच्या शाळेतील सहत शिवनेरीवर गेली होती तेंव्हा एका चौथीतल्या मुलीने निरागस प्रश्न विचारला "बाई, फक्त पाणी प्यायला इतक्या वर गडावर का आलो." आता इथे दोष कोणाचा या आरोप प्रत्यारोपाच्या तपशीलात मी शिरत नाही. दोष कुणाचाही असला तरी नुकसात त्या मुलीचे आणि पर्यायाने काही प्रमाणात तिच्या पुढच्या पिढ्यांचे झाले.
आज मराठी हा ब्रांड (पंजाबी आणि गुजराथी सारखा) प्रस्थापित करण्याची गरज आहे, आणि त्यात पुर्वी होऊन गेलेल्या सर्व थोर मंडळींचे चरित्र मदत करेल. थोरपुरुषांची चरित्रे अभ्यासुन पाहण्याचा हाच एक फायदा असतो कि आपल्याला कळते कि काय केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे. शिवाय जेंव्हा आपल्या ध्येय ठाऊक होते तेंव्हा पळण्यामधे एक निश्चय येतो. अशी जीवनातील ध्येये आपल्याला अशा थोर लोकांच्या चरित्रामधुन मिळतात. त्यामुळे प्रत्येक पिढीतील लेखकांवर आणि साहित्यिकांवर हे एक सामाजिक उत्तरदायित्व आहे कि अशा तत्कालिन थोर पुरुषांचे चरित्र पुस्तकरुपाने नविन पिढीसमोर ठेवणे.
नुकतिच शिवजयंती झाली. मग आपण फक्त ईमेल फोरवर्ड करुन किंवा फेसबुकवर शिवाजीमहाराजांच्या फोटोला लाईक करुन आपण त्या महान राजाविषयीचा आदर दाखवणार आहोत का? त्या महान राजाच्या जीवनातुन आपल्यावर आणि त्यातुन आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो आहे आणि त्या प्रभावातुन काय सकारात्मक बदल आपल्या विचारात येत आहे ते पाहणे महत्वाचे, अन्यथा वर्षामागुन वर्षे जात राहणार आणि आपण आपल्याच धुंदित मृत्युच्या समिप जात राहणार.
-अभी
मालकंस
योऽसौ ध्वनिविशेषस्तु स्वरवर्णविभूषितः ।
रञ्जको जनचित्तानां स च राग उदाहृतः ।।
"स्वर आणि त्यायोगे सौंदर्य प्राप्त झालेली ध्वनीची एक विशेष रचना ती की जी जनचित्ताचे (मानवह्र्दयांचे) रंजन करु शकते, त्या ध्वनिरचनेला बुध्दिमान लोक राग म्हणतात."
"That which is a special dhvani, is bedecked with swara and varna and is colorful or delightful to the minds of the people, is said to be raga"
- Matanga in the Brihaddeshi.
Wednesday, February 29, 2012
Saturday, January 7, 2012
Monday, December 19, 2011
टाईम पास - प्रोतिमा बेदी
माझ्या जीवन पटाचे रंग मला जसे दिसले,जसे वाटले तसे सांगणे हि सर्वात सोपी गोष्ट
जगणे माझा फायदा उठवला, माझा हलकट नवरा (कबीर बेदी) माझ्या पदरात दोन मूल टाकून सोडून गेला, आणि काहीच घडले नाही अशा थाटात दुसरे लग्न करून मोकळा झाला एका प्रतिष्ठित वकीलामुळे माझा पाय घसरला नाव्त्याची सीता होणे मला शक्य नव्हते , न मी माझ्या प्रेमिकांची राधिका होते, मी माझ्या मुलांची यशोदा होवू नाही शकले लौकिकार्थाने पूर्णपणे अपयशी ठरले ,total flop !! मला जे करावेसे वाटले तेच मी कायम करत आले ,कोण काय म्हणेल याला मी कडी ची हि किंमत दिली नाही माझे तारुण्य,माझे लैगिक जीवन, माझी बुद्धीमत्ता, या गोष्टी मी दिमाखाने मिरवल्या आहेत, हे सगळे मी अगदी निलाजरे पाने केले आहे ,मी खूप जणावर प्रेम केलेय .मी आयुष्यात बरेच काही मिळवले आहे असे बर्याच लोकांना वाटते पण ते तसे नाहीय मी फक़्त जगत राहिले
जे जस घडत तसे घडू द्यावे,
ते आपण पटवून घ्यावे
आपण स्वतावर एक मोठी कृपा करू शकतो ती म्हणजे
get out ऑफ your own way !!
खरे तर आपल्या सगळ्यांना शहाणसुरत , प्रौढ होवूनच जन्माला यायची आणि निष्पाप बालपणात मृत्यूला सामोरे जायची सोय हवी होती...!!
१९७४ साली मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर विवस्त्र फिरणाऱ्या प्रोतिमा बेदीची आत्मकथा
जरूर वाचा "टाईम पास - प्रोतिमा बेदी"
Thursday, December 8, 2011
सफर मै धुप तो होगी तुम चल सको तो चलो - भाग ३
जगजीतसिंग च्या धामधुमीच्या काळात गझलचा श्रोतावर्ग फार मर्यादित होता आणि एखादा फक्त गझलचा अल्बम चालेल कि नाही याचीही शाश्वती नव्हती. मग त्या काळात जगजीतसिंग यांनी कुठे रेडिओ साठी जिंगल्स तर कुठे चित्रपटांना संगित द्यायला सुरुवात केली. अशाच एका रेडिओ जिंगल्सच्या रेकॉर्डिंग स्टुडियोमधे जगजित आणि चित्राची भेट झाली. या आठवणीबद्द्ल चित्रासिंग सांगतात कि जेंव्हा मी जगजित ला पाहिले तेंव्हा मला वाटले हा एक साधासुधा माणुस असेल पण जेंव्हा मी त्याचे गाणे ऐकले मला कळले कि "बंदे में दम है" चित्रासिंग ला आधीच्या लग्नापासुन एक मुलगी होती. तिचे नाव होते मोनिका. ती जगजितची आठवण सांगताना हळवी होऊन म्हणते कि मी लहान असताना जगजीत आमच्या शेजारच्या घरात माई-नी-माई हे पंजाबी गाणे गात होता, जेंव्हा माझ्या कानावर त्याचा मृदु आवाज पडला मी तिथे थिजुन बसले वर बर्याच वेळ हमसुन हमसुन रडत होते. त्याच्या आवाजातील आर्तता आणि पवित्रता कोणालाही हळवे करु शकत होती.
१९७० साली जगजित आणि चित्रा ३० रुपयामधे विवाहबध्द झाले. कुठलाही मोठा डामडौल नाही, पाहुणे नाही कि रिसेप्शन नाही. १९६५ ते १९७३ हि वर्षे जगजितसिंग साठी थोडी कठिणच होती. लोक खोटी आश्वासने देऊन जगजितला पार्ट्यांमधे गाण्यासाठी बोलवायची. पण या अवघड वर्षांमधे त्याचे फक्त ५ अल्बम प्रकाशित झाल्यामुळॅ अर्थप्राप्ती चे प्रमुख साधन जाहिर कार्यक्रमच होते. त्यामुळॅ मिळेल त्या कार्यक्रमाचे आमंत्रण जगजितसिंग घेत होता. एकदा एका मोठ्या उद्योगपतीने जगजितसिंग ला बँकॉक ला त्याच्या मुलीच्या लग्नात गाण्यासाठी बोलावले, जगजित गेला, ४ दिवस रोज अर्धा तास गायला पण बिदागी काय मिळाली तर राहाण्यासाठी खोली आणि रोजचे जेवण. एवढं असुनसुध्दा जगजितसिंग म्हणतो कि १९७१ साली मी सर्वात जास्त श्रीमंत झालो कारण त्या साली माझ्या मुलाचा विवेकचा (बाबु) जन्म झाला. आम्ही जेंव्हा बाबुला घरी आणले तेंव्हा आमच्या कडे एक खोली असलेली अपार्टमेंट होती, फारच कमी पैसा होता पण मी सर्वात खुश होतो. त्यावेळी पैशाचे गणित जमवण्यासाठी कित्येक गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस चित्रा २० दिवसाच्या बाबुला छातिशी धरुन गाणी गायची.
१९७५ साली एच एम व्ही ने जगजित ला त्यांच्या पहिला लाँग प्ले (LP) अल्बम काढण्याची ऑफर दिली. या संधीची जगजितसिंग कधीपासुन वाट पहात होता. अल्बमचे नाव होते अनफरगेटेबल्स (The Unforgettables). लॉकिकार्थाने हा अल्बम त्यावेळच्या इतर गझल् अल्बम पेक्षा सर्वस्वी वेगळा होता ज्यात आधुनिक वाद्ये पारंपारिक सारंगीच्या खांद्याला खांदे लावुन झंकारत होते.गझल गायकीमधे एक नवीन पर्व सुरु झाले होते. पण यामुळे समिक्षकांच्या भुवया उंचावल्या, पण त्यांनाही जेंव्हा जगजितसिंगची गझल ला पायातील पारंपारिक बेड्या तोडण्याची दुरदृष्टी समजली तेंव्हा त्यांनी हि जगजितसिंग ला कुर्निसात केले. याच अल्बमनंतर जगजितसिंगने आपला मुंबईतील पहिला वहिला फ्लॅट घेतला.
यानंतरचा पुढचा अल्बम होता "बिरहा दा सुलतान" (विरहाचा राजा). हा अल्बम शिवकुमार बटलवी यांच्या पंजाबी कवितांवर होता. बटलवींच्या या कवितेतले दु:ख आणि जगजितसिंगचा ते दु:ख काळजापर्यंत पोहचवणारा आवाज या दोघांचे गारुड आजही लोकांच्या मनावरील ताबा सोडत नाही. कित्येक वर्षे जगजितसिंगच्या जाहिर कार्यक्रमात शिक्रा या "बिरहा दा सुलतान" मधील गाण्याची फर्माईश होत होती. हे गाणेच तसे आहे. या गाण्यात कवी आपल्या प्रियजनाला घारीची उपमा देत म्हणतो तुला मी दिलेले अन्न आवडत नसेल तर मी माझे काळिज काढुन देतो. "बिरहा दा सुलतान" (विरहाचा राजा) च्या यशानंतर जगजित चित्राने त्यांचा पहिला दोघांचा अल्बम "कम अलाइव्ह" (Come Alive) काढला. संपुर्ण पश्चिम आशिया खंडात जगजित चित्रा च्या गाण्याचे भक्त वाढु लागले. १९७९ आणि १९८२ साली इंग्लंड ची टुर केल्यावर त्यांनी तिथे आणखी दोन अल्बम प्रकाशित केले "Live at Wembley" and "Live at Royal Albert Hall". एकदा असाच इंग्लंड मधे दोन दिवस लागोपाठ कार्यक्रम होता, दोन्ही दिवसाची ६००० क्षमता असलेल्या सभागृहाची तिकिटे ३ तासात संपली. जगजीतसिंग लोकप्रियता वाढतच होती. १९८० मधे जगजीत सिंग साथ साथ या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांची कविता गायली. आणि बाकी सर्व इतिहास सर्वज्ञात आहे. या चित्रपटासाठी फार कमी पैशे मिळुनही जगजितसिंग मनापासुन हे काम केलेले ऐकुनच कळते. या चित्रपटाचा दिग्दर्शक रमन कुमार यांनी रेकॉर्डिंग साठी फार बजेट ठेवले नव्हते, जगजितसिंग पदरमोड करुन दर्जेदार रेकॉर्डिंग करुन घेतले. अर्थ चित्रपटाचे संगितही याच वर्षी आले. आजही अर्थ आणि साथ साथ एच एम व्ही च्या विक्रमी विक्री होत असलेले अल्बम आहेत.
१९८७ मधे जगजितसिंग ने "Beyond Time" हा पहिला संपुर्ण डिजीटल सी डी अल्बम प्रकाशित करुन भारतिय संगितामधे आणखी एक मैलाचा दगड प्रस्थापित केला. हा क्षण फक्त जगजितसिंग चित्राच नव्हे तर संपुर्ण गझलविश्वासाठी अभिमानास्पद क्षण होता. एका वर्षानंतरच जगजितसिंग ने गुलझार बरोबर मिर्झा गालिब या मालिकेसाठी करार केला. नासिरने रंगवलेला गालिब जगजित आवाजात लोकांपर्यंत पोहाचला. इथे दुसरा कोणता आवाज येऊ शकतो हि कल्पनाही कोणाच्या मनी येत नाही.
सर्वकाही स्वप्नवत चालले होते जगजितसिंग यशाची नवनवी शिखरे काबिज करत होता, आणि अघटित घडले. १९९० साली जगजित चित्राचा एकुलता एक मुलगा विवेक (वय - १८) एका कार अपघातात दिवंगत होतो. हा जगजितसिंग आणि चित्रा यांच्यावरिल सर्वात मोठा आघात होता ज्यातुन ते कधीच बाहेर पडु शकले नाही. यानंतर चित्राने कधीच स्टेज शो केले नाही कि ती स्टुडियो मधे आली नाही. जगजितसिंग निराशेच्या गर्तेत गेला, पण त्याच्या संगिताच्या प्रेमामुळेच तो या निराशेतुन बाहेर पडु शकला. त्याने ठरवले कि जे काही घडले त्याला मी माझी शक्ती बनवणार आणि तानपुरा जुळवुन विखुरलेले आयुष्य पुन्हा जोडायचा प्रयत्न करत जगजितसिंग चा रियाज पुन्हा सुरु झाला.
विवेक च्या मृत्युनंतरचा जगजितचा पहिला अल्बम पंजाबी गुरुबाणी "मन जिते जगजित" प्रकाशित झाला. जगजितच्या रसिकांना जगजित चा आवाज पुन्हा मिळाला पण चित्राचा कधीच नाही. पुत्रवियोगानंतर जगजितसिंग आणखी अल्बम आले "Someone Somewhere", "Hope", "Kahkashan", "Visions", "Face to Face", "Silsilay", "Marasim", "Forget me Not" आणि येतच राहिले. १९९१ साली जगजितसिंग चा गानकोकिला लता मंगेशकर बरोबर सजदा हा अल्बम प्रकाशित झाला. आणि गैरफिल्मी अल्बम विक्रि मधे नवा उच्चांक प्रस्थापित झाला. एवढ्या मोठ्या धक्क्यातुन जगजितसिंग सावरला किंवा आता त्याला सर्व दु:ख खुजे वाटु लागली. जगजितसिंग गातच राहिले. इतके कि २००१ साली त्यांची आई गेल्यावर अंत्यसंस्कारानंतर ते कलकत्त्याच्या पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघुन गेले.
विवेकच्या जाण्यानंतर जगजितची अध्यात्मिक बाजु हळुहळु पुढे येऊ लागली. निरनिराळ्या संताची भजने जगजितच्या आवाजाचा परिसस्पर्श लाभुन लोकांपर्यत भावासहित पोहचु लागली. ख्यातनाम शायर निदा फाजली जगजितच्या वाढत्या तरुण चाहत्यांना पाहुन येथे मनोगत व्यक्त करतात कि "आता असे वाटते आहे कि जगजितला आता हजारो मुलं आहेत जी त्याच्यावर खुप प्रेम करतात."
जगजितसिंगने नवीन उद्योन्मुख गायकांना नेहमीच प्रोत्साहन दिले. येथे जगजितसिंग म्हणतो ,"मी जेंव्हा मुंबईत आलो, तेंव्हा मला कोणीच मदत केली नव्हती, आणि कोणाला मदत केल्याने तुमचे स्थान कधीच धोक्यात येऊ शकत नाही. आणि हे सर्व माझ्याअवरिल संस्कार आहेत, जे आम्ही आमच्या आई वडिलांना करताना पाहिले तेच आम्ही आता करत आहोत." जगजितसिंग कोणाला मदत नाही केली, त्याच्या मित्रांना, सहकार्यांना, तंत्रज्ञ इतकेच काय तर अनोळखी लोकांनाही त्याने मदत केली. कुलदिप देसाई जगजितसिंग चे पि.ए. म्हणतात, "ते तुम्हाला तुम्ही मागण्याआधिच सर्वकाही देऊन टाकतात." १९९० साली जगजितसिंगने काही अल्बम केले ज्याची रॉयल्टी Child Relief and You, the Aurobindo Ashram आणि the National Association of the Blind या संस्थाना जाते.
जगजितसिंगच्या आगमनाने गझल ला नवसंजिवनी मिळाली हे वादातित आहेच पण याचमुळे एक नवीत बाजारपेठ उभी राहिली ज्यात अनेक तंत्रज्ञ, स्टुडियो, ध्वनी अभियंते, कवी, शायर यांना काम मिळाले. उर्दु शायरांच्या ह्र्द्यात तर त्याच्यासाठी एक खास जागा असेल कारण जगजितसिग मुळेच शायरांना गायकाच्या नफ्यातील काही भाग देण्याची पध्दत रुढ झाली. जगजितसिंग चे सध्याचे ध्येय हिंदी भाषेला भारताची प्रमुख भाषा म्हणुन लोकप्रिय करण्याचे होते. त्यातले पहिले पाऊल म्हणुन त्यांनी भारताचे तात्कालिन पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित अल्बम काढला. उर्दु भाषेत एवढे अल्बम काढल्यानंतर हिंदी भाषेत अल्बम काढण्याचे पाऊल नक्कीच धाडसी होते. पण जगजितसिंग ने आणखी हिंदीतील अल्बम काढले. ज्यामुळे हिंदी लेखकांचा हि फायदा झाला.
भारत सरकारने जगजितसिंग यांना पद्मभुषण देऊन सन्मानित केले. आज जगजितसिंग आपल्यात नाहीत पण त्यांचे शब्द नेहमी आपल्यात राहतील. "प्रत्येक दिवस हा एक नविन सुरुवात आहे, प्रत्येक अल्बम एक नविन अल्बम आहे, प्रत्येक जाहिर कार्यक्रम एक परीक्षा आहे. भुतकाळात रमुन रहाणे सर्वात धोकादायक गोष्ट आहे. तुम्ही जे काही केले आहे, त्यापेक्षा नक्किच चांगले करु शकता, त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.
(समाप्त)
-अभी
१९७० साली जगजित आणि चित्रा ३० रुपयामधे विवाहबध्द झाले. कुठलाही मोठा डामडौल नाही, पाहुणे नाही कि रिसेप्शन नाही. १९६५ ते १९७३ हि वर्षे जगजितसिंग साठी थोडी कठिणच होती. लोक खोटी आश्वासने देऊन जगजितला पार्ट्यांमधे गाण्यासाठी बोलवायची. पण या अवघड वर्षांमधे त्याचे फक्त ५ अल्बम प्रकाशित झाल्यामुळॅ अर्थप्राप्ती चे प्रमुख साधन जाहिर कार्यक्रमच होते. त्यामुळॅ मिळेल त्या कार्यक्रमाचे आमंत्रण जगजितसिंग घेत होता. एकदा एका मोठ्या उद्योगपतीने जगजितसिंग ला बँकॉक ला त्याच्या मुलीच्या लग्नात गाण्यासाठी बोलावले, जगजित गेला, ४ दिवस रोज अर्धा तास गायला पण बिदागी काय मिळाली तर राहाण्यासाठी खोली आणि रोजचे जेवण. एवढं असुनसुध्दा जगजितसिंग म्हणतो कि १९७१ साली मी सर्वात जास्त श्रीमंत झालो कारण त्या साली माझ्या मुलाचा विवेकचा (बाबु) जन्म झाला. आम्ही जेंव्हा बाबुला घरी आणले तेंव्हा आमच्या कडे एक खोली असलेली अपार्टमेंट होती, फारच कमी पैसा होता पण मी सर्वात खुश होतो. त्यावेळी पैशाचे गणित जमवण्यासाठी कित्येक गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस चित्रा २० दिवसाच्या बाबुला छातिशी धरुन गाणी गायची.
१९७५ साली एच एम व्ही ने जगजित ला त्यांच्या पहिला लाँग प्ले (LP) अल्बम काढण्याची ऑफर दिली. या संधीची जगजितसिंग कधीपासुन वाट पहात होता. अल्बमचे नाव होते अनफरगेटेबल्स (The Unforgettables). लॉकिकार्थाने हा अल्बम त्यावेळच्या इतर गझल् अल्बम पेक्षा सर्वस्वी वेगळा होता ज्यात आधुनिक वाद्ये पारंपारिक सारंगीच्या खांद्याला खांदे लावुन झंकारत होते.गझल गायकीमधे एक नवीन पर्व सुरु झाले होते. पण यामुळे समिक्षकांच्या भुवया उंचावल्या, पण त्यांनाही जेंव्हा जगजितसिंगची गझल ला पायातील पारंपारिक बेड्या तोडण्याची दुरदृष्टी समजली तेंव्हा त्यांनी हि जगजितसिंग ला कुर्निसात केले. याच अल्बमनंतर जगजितसिंगने आपला मुंबईतील पहिला वहिला फ्लॅट घेतला.
यानंतरचा पुढचा अल्बम होता "बिरहा दा सुलतान" (विरहाचा राजा). हा अल्बम शिवकुमार बटलवी यांच्या पंजाबी कवितांवर होता. बटलवींच्या या कवितेतले दु:ख आणि जगजितसिंगचा ते दु:ख काळजापर्यंत पोहचवणारा आवाज या दोघांचे गारुड आजही लोकांच्या मनावरील ताबा सोडत नाही. कित्येक वर्षे जगजितसिंगच्या जाहिर कार्यक्रमात शिक्रा या "बिरहा दा सुलतान" मधील गाण्याची फर्माईश होत होती. हे गाणेच तसे आहे. या गाण्यात कवी आपल्या प्रियजनाला घारीची उपमा देत म्हणतो तुला मी दिलेले अन्न आवडत नसेल तर मी माझे काळिज काढुन देतो. "बिरहा दा सुलतान" (विरहाचा राजा) च्या यशानंतर जगजित चित्राने त्यांचा पहिला दोघांचा अल्बम "कम अलाइव्ह" (Come Alive) काढला. संपुर्ण पश्चिम आशिया खंडात जगजित चित्रा च्या गाण्याचे भक्त वाढु लागले. १९७९ आणि १९८२ साली इंग्लंड ची टुर केल्यावर त्यांनी तिथे आणखी दोन अल्बम प्रकाशित केले "Live at Wembley" and "Live at Royal Albert Hall". एकदा असाच इंग्लंड मधे दोन दिवस लागोपाठ कार्यक्रम होता, दोन्ही दिवसाची ६००० क्षमता असलेल्या सभागृहाची तिकिटे ३ तासात संपली. जगजीतसिंग लोकप्रियता वाढतच होती. १९८० मधे जगजीत सिंग साथ साथ या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांची कविता गायली. आणि बाकी सर्व इतिहास सर्वज्ञात आहे. या चित्रपटासाठी फार कमी पैशे मिळुनही जगजितसिंग मनापासुन हे काम केलेले ऐकुनच कळते. या चित्रपटाचा दिग्दर्शक रमन कुमार यांनी रेकॉर्डिंग साठी फार बजेट ठेवले नव्हते, जगजितसिंग पदरमोड करुन दर्जेदार रेकॉर्डिंग करुन घेतले. अर्थ चित्रपटाचे संगितही याच वर्षी आले. आजही अर्थ आणि साथ साथ एच एम व्ही च्या विक्रमी विक्री होत असलेले अल्बम आहेत.
१९८७ मधे जगजितसिंग ने "Beyond Time" हा पहिला संपुर्ण डिजीटल सी डी अल्बम प्रकाशित करुन भारतिय संगितामधे आणखी एक मैलाचा दगड प्रस्थापित केला. हा क्षण फक्त जगजितसिंग चित्राच नव्हे तर संपुर्ण गझलविश्वासाठी अभिमानास्पद क्षण होता. एका वर्षानंतरच जगजितसिंग ने गुलझार बरोबर मिर्झा गालिब या मालिकेसाठी करार केला. नासिरने रंगवलेला गालिब जगजित आवाजात लोकांपर्यंत पोहाचला. इथे दुसरा कोणता आवाज येऊ शकतो हि कल्पनाही कोणाच्या मनी येत नाही.
सर्वकाही स्वप्नवत चालले होते जगजितसिंग यशाची नवनवी शिखरे काबिज करत होता, आणि अघटित घडले. १९९० साली जगजित चित्राचा एकुलता एक मुलगा विवेक (वय - १८) एका कार अपघातात दिवंगत होतो. हा जगजितसिंग आणि चित्रा यांच्यावरिल सर्वात मोठा आघात होता ज्यातुन ते कधीच बाहेर पडु शकले नाही. यानंतर चित्राने कधीच स्टेज शो केले नाही कि ती स्टुडियो मधे आली नाही. जगजितसिंग निराशेच्या गर्तेत गेला, पण त्याच्या संगिताच्या प्रेमामुळेच तो या निराशेतुन बाहेर पडु शकला. त्याने ठरवले कि जे काही घडले त्याला मी माझी शक्ती बनवणार आणि तानपुरा जुळवुन विखुरलेले आयुष्य पुन्हा जोडायचा प्रयत्न करत जगजितसिंग चा रियाज पुन्हा सुरु झाला.
विवेक च्या मृत्युनंतरचा जगजितचा पहिला अल्बम पंजाबी गुरुबाणी "मन जिते जगजित" प्रकाशित झाला. जगजितच्या रसिकांना जगजित चा आवाज पुन्हा मिळाला पण चित्राचा कधीच नाही. पुत्रवियोगानंतर जगजितसिंग आणखी अल्बम आले "Someone Somewhere", "Hope", "Kahkashan", "Visions", "Face to Face", "Silsilay", "Marasim", "Forget me Not" आणि येतच राहिले. १९९१ साली जगजितसिंग चा गानकोकिला लता मंगेशकर बरोबर सजदा हा अल्बम प्रकाशित झाला. आणि गैरफिल्मी अल्बम विक्रि मधे नवा उच्चांक प्रस्थापित झाला. एवढ्या मोठ्या धक्क्यातुन जगजितसिंग सावरला किंवा आता त्याला सर्व दु:ख खुजे वाटु लागली. जगजितसिंग गातच राहिले. इतके कि २००१ साली त्यांची आई गेल्यावर अंत्यसंस्कारानंतर ते कलकत्त्याच्या पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघुन गेले.
विवेकच्या जाण्यानंतर जगजितची अध्यात्मिक बाजु हळुहळु पुढे येऊ लागली. निरनिराळ्या संताची भजने जगजितच्या आवाजाचा परिसस्पर्श लाभुन लोकांपर्यत भावासहित पोहचु लागली. ख्यातनाम शायर निदा फाजली जगजितच्या वाढत्या तरुण चाहत्यांना पाहुन येथे मनोगत व्यक्त करतात कि "आता असे वाटते आहे कि जगजितला आता हजारो मुलं आहेत जी त्याच्यावर खुप प्रेम करतात."
जगजितसिंगने नवीन उद्योन्मुख गायकांना नेहमीच प्रोत्साहन दिले. येथे जगजितसिंग म्हणतो ,"मी जेंव्हा मुंबईत आलो, तेंव्हा मला कोणीच मदत केली नव्हती, आणि कोणाला मदत केल्याने तुमचे स्थान कधीच धोक्यात येऊ शकत नाही. आणि हे सर्व माझ्याअवरिल संस्कार आहेत, जे आम्ही आमच्या आई वडिलांना करताना पाहिले तेच आम्ही आता करत आहोत." जगजितसिंग कोणाला मदत नाही केली, त्याच्या मित्रांना, सहकार्यांना, तंत्रज्ञ इतकेच काय तर अनोळखी लोकांनाही त्याने मदत केली. कुलदिप देसाई जगजितसिंग चे पि.ए. म्हणतात, "ते तुम्हाला तुम्ही मागण्याआधिच सर्वकाही देऊन टाकतात." १९९० साली जगजितसिंगने काही अल्बम केले ज्याची रॉयल्टी Child Relief and You, the Aurobindo Ashram आणि the National Association of the Blind या संस्थाना जाते.
जगजितसिंगच्या आगमनाने गझल ला नवसंजिवनी मिळाली हे वादातित आहेच पण याचमुळे एक नवीत बाजारपेठ उभी राहिली ज्यात अनेक तंत्रज्ञ, स्टुडियो, ध्वनी अभियंते, कवी, शायर यांना काम मिळाले. उर्दु शायरांच्या ह्र्द्यात तर त्याच्यासाठी एक खास जागा असेल कारण जगजितसिग मुळेच शायरांना गायकाच्या नफ्यातील काही भाग देण्याची पध्दत रुढ झाली. जगजितसिंग चे सध्याचे ध्येय हिंदी भाषेला भारताची प्रमुख भाषा म्हणुन लोकप्रिय करण्याचे होते. त्यातले पहिले पाऊल म्हणुन त्यांनी भारताचे तात्कालिन पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित अल्बम काढला. उर्दु भाषेत एवढे अल्बम काढल्यानंतर हिंदी भाषेत अल्बम काढण्याचे पाऊल नक्कीच धाडसी होते. पण जगजितसिंग ने आणखी हिंदीतील अल्बम काढले. ज्यामुळे हिंदी लेखकांचा हि फायदा झाला.
भारत सरकारने जगजितसिंग यांना पद्मभुषण देऊन सन्मानित केले. आज जगजितसिंग आपल्यात नाहीत पण त्यांचे शब्द नेहमी आपल्यात राहतील. "प्रत्येक दिवस हा एक नविन सुरुवात आहे, प्रत्येक अल्बम एक नविन अल्बम आहे, प्रत्येक जाहिर कार्यक्रम एक परीक्षा आहे. भुतकाळात रमुन रहाणे सर्वात धोकादायक गोष्ट आहे. तुम्ही जे काही केले आहे, त्यापेक्षा नक्किच चांगले करु शकता, त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.
(समाप्त)
-अभी
| हे लेखन |
Thursday, November 24, 2011
सफर मै धुप तो होगी तुम चल सको तो चलो - भाग २
मागच्याच भागाच्या प्रतिक्रियेमध्ये अत्रुप्त आत्मा यांनी जगजितसिंग त्याच्या मैफिलीत तोंडाने घुंगराचा आवाज काढायचा. सुरुवार ते माईकच्या जवळ जाऊन छुम छुम अशा आवाजापासुन प्रत्यक्ष एखाद्या भरतनाट्यम करणार्या नर्तिकेच्या घुंगुर घालुन केलेल्या पदन्यासाचा जसा आवाज येईल अक्षरशः तसा आवाज काढायचे. दर वेळी हा घुंगर वाजवायचा कार्यक्रम "तेरा चेहरा कितना सुहाना लगता है" या गझल च्या वेळॅस व्हायचा. तसं पाहिले तर जगजित सिंग च्या गझल चा कार्यक्रम पठडितला असुनही दर वेळेस तो नव्याची अनुभुती द्यायचा. आणि या गझल मधे त्याचा अलबम मधे नसलेला एक सुंदर शेर गायचा.
"तुमसे मिलकर इमली मिठी लगली है,
तुझसे बछडकर शहद भी खारा लगता है"
तेरा चेहरा कितना, सुहाना लगता है...
याच गझल मधील आणखी एक मनाला भावणारा शेर म्हणजे -
"आग का क्या है, पल दो पल मै लगती है,
बुझते बुझते एक जमाना लगता है"
(इथे उल्लेखलेली आग हि कुठलीही असु शकते, डोळ्यांना डोळे भिडल्यावर लागलेली आग, शुल्लक कारणातुन डोक्यात संताप आणत पेटवलेली भांडणाची आग, अपमानाची आग, विरहाची आग. पण तत्त्व एकच पेटायला फार फार सोपी पण विझुन जायला बराच काळ जावा लागतो. हे ज्यांना या आगीचे चटके बसले आहेत तेच जाणु शकतात.)
आणखी त्याच्या लाइव्ह इन कॉन्सर्ट चे वैशिष्ठ म्हणजे "ठुकराओ अब के प्यार करो" याचे प्रेक्षकांना गाण्यासाठी केलेले आवाहन. आणि हि गझल हजारो मुखातुन ऐकताना आलेले शहारे अजुनही ताजे वाटतात.
आजही मी जगजितसिंगच्या सार्या मैफिलींची तिकिटे जपुन ठेवली आहेत माझ्यासाठी ती तिकिटे देखील एक अमुल्य ठेवा आहे. प्रत्येक तिकिट हे त्या मैफिलींच्या आठवणींची चावी आहे. जगजितसिंगच्या चरित्राला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यात त्या म्हणतात "संगीताचे विश्व गझल शिवाय अपुर्ण आहे आणि गझलविश्व जगजितसिंगशिवाय अपुर्ण आहे." किती नेटक्या शब्दात दिदींनी जगजितसिंगच्या योगदानाची पावती दिली आहे.
माझ्या बर्याच मित्रांना उर्दुचे वावडे होते. जगजितसिंगच्या "होटोसे छुलो तुम आणि तुम इतना जो मुस्कुरा रहे हो" सोडल्या तर बाकी गझल बाबतीत त्यांना रस वाटायचा नाही. त्यांना गझलचे संगीत आवडायचे पण अर्थ न कळल्यामुळे त्यांना गझलचा पुर्णपणे आस्वाद घेता यायचा नाही. मग काय मी एक एक जगजितसिंगची गझल घ्यायचो आणि अक्षरशः निरुपणासारखे प्रत्येक मित्राच्या भावविश्वाशी निगडित गोष्टींचा संदर्भ देऊन मी जगजितच्या गझला रंगवुन सांगु लागलो. आणि पुढे तर तो कट्टा गझलसाठी प्रसिध्द झाला होता.
जगजितसिंगचे यश मोजण्यासाठी आधी त्याच्या सुरुवातीच्या काळात जावे लागेल. १९४१ साली जगजीतसिंगचा जन्म श्रीगंगानगर, राजस्थानच्या एका शिख कुटुंबामधे झाला. श्री गंगानगर या नगराचे नाव त्याच्या राजाच्या म्हणजेच जनरल सौरभ शाह महाराजा सर गंगा सिंग बहादुर, महाराजा ऑफ बिकानेर, G.C.S.I., G.C.I.E., G.C.V.O., G.B.E., K.C.B., K.I.H यांच्या नावावरुन दिले. श्रीगंगानगर च्या वाळवंटाचे रुपांतर याच महाराजांच्या धोरणीपणामुळे एका हिरव्यागार प्रदेशात झाले. आता श्रीगंगानगर राजस्थानची अन्नाची परडी म्हणुन ओळखला जातो. जगजितसिंगचे पाळण्यातले नाव जगमोहन होते पण त्याच्या वडिलांनी गुरुंच्या सांगण्यावरुन त्याचे नाव जगजितसिंग ठेवले. जगजितसिंचे वडिल एक सरकारी कर्मचारी होते आणि घरची परिस्थितीही यथा तथा च होती. जगजितसिंग म्हणतो कि त्या काळी पतंग उडवणे, रेडियो ऐकणे हि सारी श्रीमंतीची लक्षणे होती. आम्ही दिव्याखाली अभ्यास करायचो कारण घरी वीज नव्हती.
शिख पंथामधे शास्त्रिय संगिताला फार वरचे स्थान आहे. १९४८ साली जगजितसिंच्या वडिलांनी त्यांना आधी पंडित छगनलाल शर्मा जे दृष्टीहिन होते आणि नंतर उस्ताद जमाल खान (सेनीया घराना) यांच्या कडे शास्त्रिय संगिताच्या अध्ययनासाठी पाठवले. ९ वर्षाचे असताना जगजितसिंग यांनी जाहिर कार्यक्रमांना सुरुवात केली. आधी ते गुरुद्वारा मधे शबद गायचे. लोक त्यांना बक्षीसी म्हणुन ५ रुपयाची नोट किंवा २ रुपयाची नोट द्यायचे. जगजितसिंगच्या महाविद्यालयीन जीवनातली एक आठवण प्रसिद्ध आहे. त्यांचा असाच एक जाहिर कार्यक्रम चालु होता, ४००० लोक जमले होते. गझल रंगात आली होती आणि अचानक वीज गेली सर्व मांडव आणि रंगमंच अंधारात बुडाला पण योगायोगाने ध्वनीवर्धक\कर्णे बॅटरीवर होते त्यामुळॅ आवाज लोकांना ऐकु येत होता. जगजितसिंग गातच राहिले आणि लोकही हलले नाही. मैफल रंगतच गेली. अशा घटनांमधुनच जगजितजींचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी मनोमन ठरवले कि आता संगितामधेच करियर करायचे. जगजितजीच्या वडिलांना त्यांनी कलेक्टर व्हावे अशी इच्छा होती.
तरुणपणी जगजितजींनी रडिओवर शास्त्रिय संगितातील मान्यवरांना खुप ऐकले. तलद मेहमुद, बडे गुलाम अलि खान, आमिर खान, अब्दुल करिम खान यांचे संगित ऐकुन आणि स्वत:ची उर्दु भाषेची आवड ओळखुन त्यांनी स्वत:चीच एक बोल-प्रधान गायकी बनवली ज्यात वाद्यांपेक्षा शब्द आणि भाव यांना जास्त महत्त्व होते.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी जगजितसिंगने जालंधरचे D.A.V. महाविद्यालय निवडले कारण मुख्याध्यापकांनी गुणी गायकांसाठी महाविद्यालयीन शुल्क आणि वसतीगृहाचे शुल्क माफ केले होते. दुसरे कारण म्हणजे जालंधरचे ऑल इंडिया रेडिओ स्टेशन (AIR) शास्त्रिय संगितातले कार्यक्रम प्रसारित करायचे. ऑल इंडिया रेडिओ ने त्यांना B ग्रेड कलाकाराचा दर्जा देऊन अत्यंत कमी वेतनावर वर्षाला सहा कार्यक्रमासाठी करारबध्द केले. १९६२ मधे जेंव्हा भारताचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी जालंधरला भेट दिली होती तेंव्हा त्याच्या स्वागतासाठी जगजितसिंगने एक गाणे स्वरबध्द केले होते.
जेंव्हा महाविद्यालयाला आंतर्-विद्यापिठिय संगित स्पर्धेसाठी शास्त्रिय आणि सुगम संगितासाठी प्रवेशिका पाठवायची होती तेंव्हा जगजितसिंगला सुगम संगित निवडावे लागले कारण त्याच्या वरिष्ठ विद्यार्थ्याने शास्त्रिय संगिताची प्रवेशिका आधिच भरली होती. पण जगजितने या संधीचेही सोने केले आणि एका मागुन एक करंडक जिंकत गेला. पुढे पुढे त्याचा चाहतावर्ग वाढत गेला आणि फर्माइशी येऊ लागल्या. १०० नोट प्रेमाने मुठीत कोंबुन त्याचे चाहते त्याला गाणं म्हणायला लावायचे.
१९६१ साली जेंव्हा जगजितसिंग मुंबईला आले. शंकर जयकिशन जोडीतील जयकिशनला त्यांचा आवाज आवडला पण त्यांच्या आवाजाला अनुरुप असे गाणे त्यांना देता आले नाही. जवळचे पैशे लगेचच संपले, त्यांच्याकडे घरी जालंधरला जाण्यासाठी सुद्धा पैशे उरले नाहीत. शेवटी मुंबई ते जालंधर हा प्रवास त्यांनी रेल्वेच्या न्हाणीघरात लपुन केला.
१९६५ मधे जगजितजींनी पुन्हा एकदा मुंबईमधे नशीब आजमावण्याचा निश्चय केला. एका अत्यंत गलिच्छ वसतिगृहात दिवस काढले. कित्येक रात्री ढेकुन आणि उंदरांच्या सहवासात काढल्या. जवळचा पैसा हळुहळु संपत होता पण देवाने त्यांच्या आर्त आवाजाची साद ऐकली आणि एच एम व्ही ने त्यांच्या दोन गझल इ पी फॉर्मॅट मधे ध्वनीमुद्रित करायचे ठरवले. (EP (Extended Play, a 1960s gramophone record format)). जेंव्हा या नव्या अलबमच्या कव्हरसाठी फोटो काढण्याची वेळ आली तेंव्हा जगजितसिंग ने आपल्या पारंपारिक शिख पगडीचा अन दाढीचा त्याग केला. त्यांच्या मते "हा फार विचार करुन घेतलेला निर्णय होता. माझा पहिल्या अलबम वरील फोटो हा माझी आयुष्य भर ओळख बनणार होता."
जगजितजींचा संघर्ष अजुनही चालुच होता, रोज वेगवेगळ्या दिग्दर्शकाच्या आणि संगितकारांच्या घरी खेटे मारणे चालुच होते. त्यावेळच्या सिनेसृष्टीतील बर्याच प्रस्थापितांनी जगजितजींचा फुकट वापर करुन घेतला. कित्येक लोक जगजितसिंगला आश्वासन देत कि आज आमच्या कडे पार्टीमधे फार मोठे मोठे लोक येणार आहेत. त्यामुळे तिथे तुमचे गाणे का नाही सादर करत? पण पार्टीनंतर कोणीही पुन्हा चौकशी करायचे नाही. जगजितसिंगचे मोठे भाउ कर्तार सिंग म्हणत कि झाडांच्या आजुबाजुला फिरणारे त्यावेळचे हिरो त्यांना जगजितसिंगच्या आवाजातील खर्ज, वेदना, खोली कसे झेपेल.
याचदरम्यान जगजितजींचे लक्ष गझल कडे जास्त वळु लागले. यामुळे सिनेसृष्टीचे नुकसान झाले पण, गझल जगताला त्याचा फार फार फायदा झाला. त्यावेळेस ज्यांची गझल आवर्जुन ऐकावी असे नवीन कलाकार येत नव्हते. गझल गायकी दुर्मिळ होत चालली होती. उर्दु ची लोकप्रियतेलाही फाळणी नंतर ओहोटी लागली होती. पण जगजितजींनी गझल ला आधार दिला, आकार दिला. त्यांनी स्वत:चे गझल गायकीतले वेगळॅपण जपले, जोपासले व त्याला हळुवार पणे फुलवले.
"तुमसे मिलकर इमली मिठी लगली है,
तुझसे बछडकर शहद भी खारा लगता है"
तेरा चेहरा कितना, सुहाना लगता है...
याच गझल मधील आणखी एक मनाला भावणारा शेर म्हणजे -
"आग का क्या है, पल दो पल मै लगती है,
बुझते बुझते एक जमाना लगता है"
(इथे उल्लेखलेली आग हि कुठलीही असु शकते, डोळ्यांना डोळे भिडल्यावर लागलेली आग, शुल्लक कारणातुन डोक्यात संताप आणत पेटवलेली भांडणाची आग, अपमानाची आग, विरहाची आग. पण तत्त्व एकच पेटायला फार फार सोपी पण विझुन जायला बराच काळ जावा लागतो. हे ज्यांना या आगीचे चटके बसले आहेत तेच जाणु शकतात.)
आणखी त्याच्या लाइव्ह इन कॉन्सर्ट चे वैशिष्ठ म्हणजे "ठुकराओ अब के प्यार करो" याचे प्रेक्षकांना गाण्यासाठी केलेले आवाहन. आणि हि गझल हजारो मुखातुन ऐकताना आलेले शहारे अजुनही ताजे वाटतात.
आजही मी जगजितसिंगच्या सार्या मैफिलींची तिकिटे जपुन ठेवली आहेत माझ्यासाठी ती तिकिटे देखील एक अमुल्य ठेवा आहे. प्रत्येक तिकिट हे त्या मैफिलींच्या आठवणींची चावी आहे. जगजितसिंगच्या चरित्राला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यात त्या म्हणतात "संगीताचे विश्व गझल शिवाय अपुर्ण आहे आणि गझलविश्व जगजितसिंगशिवाय अपुर्ण आहे." किती नेटक्या शब्दात दिदींनी जगजितसिंगच्या योगदानाची पावती दिली आहे.
माझ्या बर्याच मित्रांना उर्दुचे वावडे होते. जगजितसिंगच्या "होटोसे छुलो तुम आणि तुम इतना जो मुस्कुरा रहे हो" सोडल्या तर बाकी गझल बाबतीत त्यांना रस वाटायचा नाही. त्यांना गझलचे संगीत आवडायचे पण अर्थ न कळल्यामुळे त्यांना गझलचा पुर्णपणे आस्वाद घेता यायचा नाही. मग काय मी एक एक जगजितसिंगची गझल घ्यायचो आणि अक्षरशः निरुपणासारखे प्रत्येक मित्राच्या भावविश्वाशी निगडित गोष्टींचा संदर्भ देऊन मी जगजितच्या गझला रंगवुन सांगु लागलो. आणि पुढे तर तो कट्टा गझलसाठी प्रसिध्द झाला होता.
जगजितसिंगचे यश मोजण्यासाठी आधी त्याच्या सुरुवातीच्या काळात जावे लागेल. १९४१ साली जगजीतसिंगचा जन्म श्रीगंगानगर, राजस्थानच्या एका शिख कुटुंबामधे झाला. श्री गंगानगर या नगराचे नाव त्याच्या राजाच्या म्हणजेच जनरल सौरभ शाह महाराजा सर गंगा सिंग बहादुर, महाराजा ऑफ बिकानेर, G.C.S.I., G.C.I.E., G.C.V.O., G.B.E., K.C.B., K.I.H यांच्या नावावरुन दिले. श्रीगंगानगर च्या वाळवंटाचे रुपांतर याच महाराजांच्या धोरणीपणामुळे एका हिरव्यागार प्रदेशात झाले. आता श्रीगंगानगर राजस्थानची अन्नाची परडी म्हणुन ओळखला जातो. जगजितसिंगचे पाळण्यातले नाव जगमोहन होते पण त्याच्या वडिलांनी गुरुंच्या सांगण्यावरुन त्याचे नाव जगजितसिंग ठेवले. जगजितसिंचे वडिल एक सरकारी कर्मचारी होते आणि घरची परिस्थितीही यथा तथा च होती. जगजितसिंग म्हणतो कि त्या काळी पतंग उडवणे, रेडियो ऐकणे हि सारी श्रीमंतीची लक्षणे होती. आम्ही दिव्याखाली अभ्यास करायचो कारण घरी वीज नव्हती.
शिख पंथामधे शास्त्रिय संगिताला फार वरचे स्थान आहे. १९४८ साली जगजितसिंच्या वडिलांनी त्यांना आधी पंडित छगनलाल शर्मा जे दृष्टीहिन होते आणि नंतर उस्ताद जमाल खान (सेनीया घराना) यांच्या कडे शास्त्रिय संगिताच्या अध्ययनासाठी पाठवले. ९ वर्षाचे असताना जगजितसिंग यांनी जाहिर कार्यक्रमांना सुरुवात केली. आधी ते गुरुद्वारा मधे शबद गायचे. लोक त्यांना बक्षीसी म्हणुन ५ रुपयाची नोट किंवा २ रुपयाची नोट द्यायचे. जगजितसिंगच्या महाविद्यालयीन जीवनातली एक आठवण प्रसिद्ध आहे. त्यांचा असाच एक जाहिर कार्यक्रम चालु होता, ४००० लोक जमले होते. गझल रंगात आली होती आणि अचानक वीज गेली सर्व मांडव आणि रंगमंच अंधारात बुडाला पण योगायोगाने ध्वनीवर्धक\कर्णे बॅटरीवर होते त्यामुळॅ आवाज लोकांना ऐकु येत होता. जगजितसिंग गातच राहिले आणि लोकही हलले नाही. मैफल रंगतच गेली. अशा घटनांमधुनच जगजितजींचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी मनोमन ठरवले कि आता संगितामधेच करियर करायचे. जगजितजीच्या वडिलांना त्यांनी कलेक्टर व्हावे अशी इच्छा होती.
तरुणपणी जगजितजींनी रडिओवर शास्त्रिय संगितातील मान्यवरांना खुप ऐकले. तलद मेहमुद, बडे गुलाम अलि खान, आमिर खान, अब्दुल करिम खान यांचे संगित ऐकुन आणि स्वत:ची उर्दु भाषेची आवड ओळखुन त्यांनी स्वत:चीच एक बोल-प्रधान गायकी बनवली ज्यात वाद्यांपेक्षा शब्द आणि भाव यांना जास्त महत्त्व होते.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी जगजितसिंगने जालंधरचे D.A.V. महाविद्यालय निवडले कारण मुख्याध्यापकांनी गुणी गायकांसाठी महाविद्यालयीन शुल्क आणि वसतीगृहाचे शुल्क माफ केले होते. दुसरे कारण म्हणजे जालंधरचे ऑल इंडिया रेडिओ स्टेशन (AIR) शास्त्रिय संगितातले कार्यक्रम प्रसारित करायचे. ऑल इंडिया रेडिओ ने त्यांना B ग्रेड कलाकाराचा दर्जा देऊन अत्यंत कमी वेतनावर वर्षाला सहा कार्यक्रमासाठी करारबध्द केले. १९६२ मधे जेंव्हा भारताचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी जालंधरला भेट दिली होती तेंव्हा त्याच्या स्वागतासाठी जगजितसिंगने एक गाणे स्वरबध्द केले होते.
जेंव्हा महाविद्यालयाला आंतर्-विद्यापिठिय संगित स्पर्धेसाठी शास्त्रिय आणि सुगम संगितासाठी प्रवेशिका पाठवायची होती तेंव्हा जगजितसिंगला सुगम संगित निवडावे लागले कारण त्याच्या वरिष्ठ विद्यार्थ्याने शास्त्रिय संगिताची प्रवेशिका आधिच भरली होती. पण जगजितने या संधीचेही सोने केले आणि एका मागुन एक करंडक जिंकत गेला. पुढे पुढे त्याचा चाहतावर्ग वाढत गेला आणि फर्माइशी येऊ लागल्या. १०० नोट प्रेमाने मुठीत कोंबुन त्याचे चाहते त्याला गाणं म्हणायला लावायचे.
१९६१ साली जेंव्हा जगजितसिंग मुंबईला आले. शंकर जयकिशन जोडीतील जयकिशनला त्यांचा आवाज आवडला पण त्यांच्या आवाजाला अनुरुप असे गाणे त्यांना देता आले नाही. जवळचे पैशे लगेचच संपले, त्यांच्याकडे घरी जालंधरला जाण्यासाठी सुद्धा पैशे उरले नाहीत. शेवटी मुंबई ते जालंधर हा प्रवास त्यांनी रेल्वेच्या न्हाणीघरात लपुन केला.
१९६५ मधे जगजितजींनी पुन्हा एकदा मुंबईमधे नशीब आजमावण्याचा निश्चय केला. एका अत्यंत गलिच्छ वसतिगृहात दिवस काढले. कित्येक रात्री ढेकुन आणि उंदरांच्या सहवासात काढल्या. जवळचा पैसा हळुहळु संपत होता पण देवाने त्यांच्या आर्त आवाजाची साद ऐकली आणि एच एम व्ही ने त्यांच्या दोन गझल इ पी फॉर्मॅट मधे ध्वनीमुद्रित करायचे ठरवले. (EP (Extended Play, a 1960s gramophone record format)). जेंव्हा या नव्या अलबमच्या कव्हरसाठी फोटो काढण्याची वेळ आली तेंव्हा जगजितसिंग ने आपल्या पारंपारिक शिख पगडीचा अन दाढीचा त्याग केला. त्यांच्या मते "हा फार विचार करुन घेतलेला निर्णय होता. माझा पहिल्या अलबम वरील फोटो हा माझी आयुष्य भर ओळख बनणार होता."
जगजितजींचा संघर्ष अजुनही चालुच होता, रोज वेगवेगळ्या दिग्दर्शकाच्या आणि संगितकारांच्या घरी खेटे मारणे चालुच होते. त्यावेळच्या सिनेसृष्टीतील बर्याच प्रस्थापितांनी जगजितजींचा फुकट वापर करुन घेतला. कित्येक लोक जगजितसिंगला आश्वासन देत कि आज आमच्या कडे पार्टीमधे फार मोठे मोठे लोक येणार आहेत. त्यामुळे तिथे तुमचे गाणे का नाही सादर करत? पण पार्टीनंतर कोणीही पुन्हा चौकशी करायचे नाही. जगजितसिंगचे मोठे भाउ कर्तार सिंग म्हणत कि झाडांच्या आजुबाजुला फिरणारे त्यावेळचे हिरो त्यांना जगजितसिंगच्या आवाजातील खर्ज, वेदना, खोली कसे झेपेल.
याचदरम्यान जगजितजींचे लक्ष गझल कडे जास्त वळु लागले. यामुळे सिनेसृष्टीचे नुकसान झाले पण, गझल जगताला त्याचा फार फार फायदा झाला. त्यावेळेस ज्यांची गझल आवर्जुन ऐकावी असे नवीन कलाकार येत नव्हते. गझल गायकी दुर्मिळ होत चालली होती. उर्दु ची लोकप्रियतेलाही फाळणी नंतर ओहोटी लागली होती. पण जगजितजींनी गझल ला आधार दिला, आकार दिला. त्यांनी स्वत:चे गझल गायकीतले वेगळॅपण जपले, जोपासले व त्याला हळुवार पणे फुलवले.
| हे लेखन |
Subscribe to:
Posts (Atom)


