मिशेल या शहरात परतुन आता बरीच वर्षे झाली होती. मिशेल जरी या गावात जन्मली असली तरी हे गाव तिच्या स्वप्नातील गावापेक्षा फार वेगळे होते. तिला आवडायचे गजबजलेपण. तिच्या मते शहराचे रस्ते चोविस तास माणसांनी भरुन वाहिले पाहिजे. पण हे गाव त्या मानाने बरेच वेगळे होते. कोण एके काळी हे गाव भरभराटीला आले होते. इथे बंदर होते, कोळशाच्या खाणी होत्या. देशभरातुन लोक या शहरात नोकरीला येत होते. पण विजेचा शोध लागला, हळुहळु खाणी बंद झाल्या, बंदरे ओस पडली आणि संपुर्ण शहराच्या हालचालीत एक प्रकारचा मंदपणा आला. त्यामानाने डाऊनटाऊन मधे दोन जुनी चर्च, मुख्य बस स्थानक आणि काही खानावळी होत्या. तीथे माणसं दिसायची. पण संध्याकाळ नंतर तीही ओस पडायची.
नेहमीप्रमाणे मिशेल दवाखान्यातील काम आटपुन डाऊनटाऊनच्या बसथांब्यावर बसची वाट पाहात उभी होती कधी एकदा घरी पोहचेल असे तिला झाले होते. तिची सहा वर्षाची मुलगी मारिया आता शाळेतुन घरी आली असेल. तिच्याच विचारात मिशेल दंग होती. तिने आजुबाजुला नजर फिरवली. बसथांब्यावरील वातावरणही नेहमीसारखेच होते, दिवसभर काम करुन दमलेले चेहरे, काही भिकारी आणि काही वार्यावर कवायत करणारे कागदाचे तुकडे. त्या बस थांब्याशेजारीच एक ओक वृक्ष होता. तीथे एक म्हातारे जोडपे कबुतरांना पावाचे तुकडे टाकत बसले होते. कबुतरे ही निर्धास्त होऊन माणसांच्या पायापाशी उगाचच रस्त्यावरच्या ठिपक्यांवर चोची मारत घोटाळत होते. अचानक ते म्हातारे जोडपे सावरुन उठले. मिशेल ने मान वळवली. दुरवर तिला बस येताना दिसली.
मिशेल बसमधुन उतरली. काही दिवसातच डिसेंबर सुरु होणार होता. तापमान २ डिग्री झाले होते. तिने तिचे हात ओव्हरकोटच्या खिश्यात घातले आणि घराकडे चालु लागली. थंडीची चाहुल लागल्यामुळे खारींची लगबग चालु होती. त्यांच्या मस्तीकडे पहात पहात ती चालत होती. दोन चार घर मागे गेल्यानंतर तिला झाडांआड लपलेलं तिचं घर दिसु लागलं. घराच्या फाटकापासुन घराच्या मुख्य दरवाजा पर्यंत एक पायवाट जात होती. घराच्या अंगणात एक मोठठा नाताळवृक्ष होता. तो मिशेलच्या वडिलांनी तिच्या लहानपणी लावला होता. तिच्या वडिलांनी बांधलेलं घर आता तस जुने दिसु लागले होते. मिशेल दरवाजावर टकटक केले. आणि आतुन हेलेनाच्या भुंकण्याचा आवाज आला. हेलेना हि हाऊंड जातीची कुत्री होती. मारियाच्या वडिंलाची ग्रेगची आणखी एक निशाणी. तेवढ्यात मारियाने दरवाजा उघडला. मारियाला पाहुन मिशेलचा दिवसाचा सारा शीण गळुन पडला. तिने मारिया ला कडे वर घेऊन तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले.
"किती उशीर केलास ग मम्मी!!" मारिया खोट खोट रुसुन म्हणाली.
"अगं उशीर कसला, रोजच्या प्रमाणे आले आहे." मिशेल ने उत्तर दिले.
"नाही तु उशीरा आली आहेस."
"बर राणीसाहेब, आम्ही उशीरा आलो आहोत, काय शिक्षा देणार आहात?"
"विचार करुन सांगु!!" अस म्हणुन मारिया पुन्हा आपल्या खोलीत पळुन गेली.
जेवण वैगेरे उरकुन मिशेल, मारियाला कुशीत घेऊन झोपायचा प्रयत्न करत होती. पण तिला झोप लागत नव्हती. तिची नजर कॅलेंडरवर होती. नाताळ महिन्याभरावर आला होता आणि अजुनही तिच्या कडे घर सजवायला, नाताळच्या तयारीसाठी पैशे नव्हते.
"मम्मी, मी तुला माफ केले." मारिया च्या आवाजाने मिशेल तंद्रितुन बाहेर आली.
"अग तु तर झोपली होतीस ना?"
"हो झोपतच आहे. तु जा. तुला मी माफ केले. पण मी नाताळबाबा पत्र लिहिणार आहे कि मला या वर्षी नाताळात नवीन सायकल हवी आहे. मी एक चांगली मुलगी आहे. त्याने सांगितल्या प्रमाणे मी सर्व चांगल्या गोष्टी केल्या आहेत. मी लवकर झोपते, दुध पिते, हेलेनाशी खेळल्यावर हात धुते. त्यामुळे मला खात्री आहे कि नाताळबाबा मला नक्की सायकल देईल नाताळला."
"हो हो, नक्की देईन. झोप आता खुप रात्र झाली आहे.
मारियाच्या निरागसपणाचे मिशेलला कौतुक वाटले. झोपलेल्या मारियाचे केस तिच्या चेहर्यावर आले होते. ती झोपताना एखाद्या परीसारखी दिसत होती. मिशेलला आतापर्यंतचे सारे नाताळ आठवले. प्रत्येक नाताळच्या आधी तिने मारियाला काय हवे ते जाणुन घेऊन नाताळच्या रात्री हळुच तिच्या उशाशी ठेवले होते. दुसर्या दिवशी स्वतःच्या खोलीतुन आनंदाने किंचाळत बाहेर येण्यारी मारिया पाहायची जणु मिशेलला सवयच लागली होती. पण यावर्षॉ परिस्थिती वेगळी होती.
तिचे बरेचसे पैशे ग्रेगच्या आजारपणात गेले आणि बाकिचे देणेकर्यांना वाटण्यात गेले. त्यात त्यांचे घर विकावे लागले व तिला आपल्या आईबापांच्या घरात रहावे लागतं होते. आईबाबा गेल्यापासुन हे घर तसे रिकामेच होते. तिच्या नर्सच्या नोकरीतुन जे काही यायचे ते लगेच संपुन जायचे. त्यामुळे कुठलेही वायफळ खर्च तिला आता परवडणारे नव्हते. ग्रेगची उणीव तिला आज प्रकर्षाने जाणवत होती.
ग्रेग होता हि तसाच एका झंझावातासारखा. आपल्या आजुबाजुच्या सर्वांना आपल्या पंखाखाली घेऊन भारावुन टाकायचा. त्याबरोबर आयुष्य जगण्यात एक थ्रिल होते. त्याच रॉक संगिताचे वेड, त्याची गिटार, त्याचे प्लेक्ट्रमचा संग्रह, त्याच्या अत्तराच्या बाटल्या आणि त्याचे मनगटी घड्याळ सारे सारे काही तिने जपुन ठेवले होते. ग्रेग अजुनही तिच्या जवळ होता. अजुनही तो त्याच्या या सार्या मागे राहिलेल्या खुणातुन तिला जगण्याचे बळ देत होता. ग्रेग ला जेंव्हा कर्करोग झाल्याचे कळले तेंव्हा मारिया सहा महिन्याची होती. तिला ग्रेगचा सहवास हवातेवढा मिळाला नाही. म्हणुनच कि काय सार्या घरात प्रत्येक ठिकाणी तिचे, मिशेल आणि ग्रेगचे एकत्र असलेले फोटो लावलेले होते. नाताळ धुमधडाक्यात साजरा करायची सवय ग्रेगचीच. फार हौशी होता तो. नाताळच्या काही दिवस आधी घराची साफसफाई करणे, घराभोवतीची हिरवळ कापणे, हिमवृष्टीनंतर बर्फ साफ करणे अशी सर्व कामे तो आनंदाने करायचा. त्याच्याबरोबर आयुष्य कसे स्वप्नवत चालले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ग्रेगला कर्करोगाचे निदान होते. पौर्णिमेच्या चंद्रासारखा ग्रेग दिवसेंदिवस खंगत गेला. पण ग्रेगने चेहर्यावरचे हसु मात्र हरवु दिले नाही. मरणाप्राय वेदनांची जाणिव मिशेलला होऊ दिली नाही. ग्रेग स्वतः बरोबर तिचे भावविश्व देखिल घेऊन गेला होता.
ग्रेग असेपर्यंत नाताळामधे खरेदी करणे काही नविन नव्हते. पण आता तिच्या नोकरीमधे घर कसेबसे चालत होते. आणि वायफळ खर्च तिला आता परवडणारे नव्हते. तिने गाढ झोपी गेलेल्या मारिया कडे पाहिले. तिच्या मऊशार केसावर हात फिरवला. झोपेतही तिच्या चेहर्यावर स्मितहास्य होते. तिच्याकडे पाहात पाहात मिशेलचाही डोळा लागला.
(क्रमंशः)
-अभिजीत
मालकंस
Friday, November 30, 2012
Monday, November 12, 2012
Adventures in the screen trade by william goldman- शशिकांत सावंत
नुकताच मामि चित्रपट महोत्सव झाला. या आणि इतर चित्रपट महोत्सवात एक नवीन जत्था गेले काही वर्षं दिसतोय. तो असतो चित्रपटाच्या विद्यार्थ्यांचा. त्यातल्या अनेकांना सिनेमात किंवा टीव्ही मालिकांमध्ये करिअर करायचं असतं. दिग्दर्शक, स्क्रिप्ट रायटर, अभिनेता, एडिटर व्हायचं असतं. देशोदेशीचे साधीसोपी कथा सांगणारे सिनेमे पाहताना आपणही असं एक दिवस करू असं वाटत असतं. यातले अनेक जण फिल्म इन्स्टिट्यूटला जातात किंवा चित्रपटात असिस्टण्ट म्हणून काम करतात किंवा एखाद्या सिरिअलमध्ये अभिनेता, संवादलेखक म्हणून शिरतात.
या माध्यमात जगणं कसं असतं? आपल्याकडे चित्रपटात काम केलेल्यांची अनेक आत्मचरित्र, चरित्र आहेत.
व्ही. शांताराम यांचं 'शांतारामा', दुर्गा खोटे यांचं 'मी दुर्गा खोटे', श्री. दा. पानवलकरांचं 'शूटिंग' तसंच प्रभात काळावरची पुस्तकं ही चित्रपटातल्या क्षणांबद्दल सांगतात. तरीही विल्यम गोल्डमनच्या 'अॅडव्हेन्चर्स इन द स्क्रीन ट्रेड'ला पर्याय नाही. का? एकतर विल्यम गोल्डमन उत्तम लेखक आहे. हॉलिवुडमध्ये त्याने दीर्घकाळ काम केलंय. 'ब्रिज, टू फार', 'हार्वर', 'ऑल द प्रेसिडेण्ट्स मॅन', 'बच कॅसिडियन अॅण्ड सन डान्स स्किड', 'मॅरेथॉन मॅन'सारखे सिनेमे लिहिलेत. पण त्याचं पुस्तक हॉलिवुडमधल्या स्ट्रगलरच्या दिवसांपासून उत्तम पटकथा, अभिनय, दिग्दर्शन, सिनेमा बनवणं अशा अंगांची थेट 'फ्रॉम हॉसेर्स माऊथ' म्हणतात तशी माहिती देतं. हे केवळ ग्लॅमरचं गुळगुळीत जग नाही, तर कठोर अंगमेहनतीचं आणि तीव्र कल्पनाशक्तीचं जग आहे, याची जाणीव तो करून देतो. एके ठिकाणी तो म्हणतो की, जेव्हा एखाद्या चांगल्या स्क्रिप्टचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा कास्टिंग, क्रू कलाकार किंवा तंत्रज्ञ ठरवण्याआधीच त्याची माहिती सर्वत्र पसरते. कारण एकतर त्या स्क्रिप्टला अनेक ठिकाणी नकार मिळालेला असतो. आणि हॉलिवुड ही एक अत्यंत लहान जमात आहे. अगदी कॅमेरामन ठरवायला गेला की, तो त्याचे असिस्टण्ट असे मिळून आणखी अनेकांना माहिती कळत जाते.
सिनेमा ग्रेट कशामुळे बनतो? याबद्दल विल्यम गोल्डमन सांगतो की वेगवेगळ्या उत्तम आणि हेलावणा-या क्षणांमुळे सिनेमा ग्रेट बनतो. जसं दिग्दर्शकाला स्टारची मर्जी सांभाळावी लागते, तशी लेखकालाही. आपल्याला उत्कृष्ट संवाद यावेत, असं प्रत्येक स्टारला वाटत असतं.
गोल्डमन केवळ स्वत:ला आलेलेच अनुभव सांगत नाही तर सिनेमाक्षेत्रात घडलेल्या इतर चित्रपटांच्या कथा, घटना, आख्यायिकाही सांगतो. त्याने लिहिलेल्या 'ऑल द प्रेसिडण्ट्स मॅन'सारख्या सिनेमाला समीक्षकांनी गौरवलं. पण स्पर्धेत असलेल्या 'रॉकी'सारख्या गल्लाभरू चित्रपटाने 'ऑस्कर' पटकावलं. याचं कारण सांगताना तो म्हणतो की 'रॉकी' हॉलिवुडचं एक स्वप्न साकार करतो, ते म्हणजे आपली स्वप्नं खरी होऊ शकतात हा विश्वास'
डस्टिन हॉफमन, फॉल न्यूमन, रॉबर्ड रेडफोर्डसारख्या नटांबरोबर गोल्डमनने काम केलं आणि रिचर्ड अॅटनबरोसारख्या दिग्दर्शकाबरोबरही. रिचर्ड अॅटनबरोचा 'ब्रीज टू फार' हा प्रचंड गाजलेला चित्रपट आहे. याच नावाच्या दुस-या महायुद्धाच्या पुस्तकावर तो आधारित आहे. १९७६ मध्ये तो दहा महिने रोज सकाळी ६ वाजता हजर असे आणि अठरा तास काम करी. यातला पॅराशूटचा सीन, पुन्हा शूट करण्यासाठी दिग्दर्शकाला निर्मात्याबरोबर भांडावं लागलं. पण त्या एकाच सीनसाठीही चित्रपट लक्षात राहतो.
या पुस्तकात अनेक ठिकाणी त्याने पटकथांचे तुकडे दिले आहेत.
गोल्डमन सांगतो की, कोणता सिनेमा चालेल किंवा आपटेल हे सांगता येत नाही. फक्त प्रेक्षकांच्या दृष्टीने त्याची भट्टी जमली आहे की नाही एवढंच सांगता येतं. आपल्याकडची नट-नट्यांची किंवा इतर आत्मचरित्र एक तर मिळमिळीत असतात किंवा मी कसा झालो हे सांगणारी असतात. त्यामानाने हे एक रोखठोक आत्मचरित्र वाचल्यावर सिनेक्षेत्राविषयी बरंच काही कळतं जे कधी कळलेलं नसतं. पॉल न्यूमनसारखा नट एकच संवाद श्वास घेण्यापूर्वी आणि श्वास घेतल्यानंतर म्हणून काय फरक पाडतो, ते त्याने सांगितलंय. अशा कितीतरी गोष्टींसाठी हे पुस्तक वाचायला हवं, तसंच सिनेमा म्हणजे नुसतं ग्लॅमर नव्हे, हे कळण्यासाठीही!
अॅडव्हेंचर्स इन द स्क्रीन ट्रेड (पर्सनल व्ह्यू ऑफ हॉलिवूड अँड स्क्रिन रायटिंग)
( लेखक - विल्यम गोल्डमन)
-अभी
या माध्यमात जगणं कसं असतं? आपल्याकडे चित्रपटात काम केलेल्यांची अनेक आत्मचरित्र, चरित्र आहेत.
व्ही. शांताराम यांचं 'शांतारामा', दुर्गा खोटे यांचं 'मी दुर्गा खोटे', श्री. दा. पानवलकरांचं 'शूटिंग' तसंच प्रभात काळावरची पुस्तकं ही चित्रपटातल्या क्षणांबद्दल सांगतात. तरीही विल्यम गोल्डमनच्या 'अॅडव्हेन्चर्स इन द स्क्रीन ट्रेड'ला पर्याय नाही. का? एकतर विल्यम गोल्डमन उत्तम लेखक आहे. हॉलिवुडमध्ये त्याने दीर्घकाळ काम केलंय. 'ब्रिज, टू फार', 'हार्वर', 'ऑल द प्रेसिडेण्ट्स मॅन', 'बच कॅसिडियन अॅण्ड सन डान्स स्किड', 'मॅरेथॉन मॅन'सारखे सिनेमे लिहिलेत. पण त्याचं पुस्तक हॉलिवुडमधल्या स्ट्रगलरच्या दिवसांपासून उत्तम पटकथा, अभिनय, दिग्दर्शन, सिनेमा बनवणं अशा अंगांची थेट 'फ्रॉम हॉसेर्स माऊथ' म्हणतात तशी माहिती देतं. हे केवळ ग्लॅमरचं गुळगुळीत जग नाही, तर कठोर अंगमेहनतीचं आणि तीव्र कल्पनाशक्तीचं जग आहे, याची जाणीव तो करून देतो. एके ठिकाणी तो म्हणतो की, जेव्हा एखाद्या चांगल्या स्क्रिप्टचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा कास्टिंग, क्रू कलाकार किंवा तंत्रज्ञ ठरवण्याआधीच त्याची माहिती सर्वत्र पसरते. कारण एकतर त्या स्क्रिप्टला अनेक ठिकाणी नकार मिळालेला असतो. आणि हॉलिवुड ही एक अत्यंत लहान जमात आहे. अगदी कॅमेरामन ठरवायला गेला की, तो त्याचे असिस्टण्ट असे मिळून आणखी अनेकांना माहिती कळत जाते.
सिनेमा ग्रेट कशामुळे बनतो? याबद्दल विल्यम गोल्डमन सांगतो की वेगवेगळ्या उत्तम आणि हेलावणा-या क्षणांमुळे सिनेमा ग्रेट बनतो. जसं दिग्दर्शकाला स्टारची मर्जी सांभाळावी लागते, तशी लेखकालाही. आपल्याला उत्कृष्ट संवाद यावेत, असं प्रत्येक स्टारला वाटत असतं.
गोल्डमन केवळ स्वत:ला आलेलेच अनुभव सांगत नाही तर सिनेमाक्षेत्रात घडलेल्या इतर चित्रपटांच्या कथा, घटना, आख्यायिकाही सांगतो. त्याने लिहिलेल्या 'ऑल द प्रेसिडण्ट्स मॅन'सारख्या सिनेमाला समीक्षकांनी गौरवलं. पण स्पर्धेत असलेल्या 'रॉकी'सारख्या गल्लाभरू चित्रपटाने 'ऑस्कर' पटकावलं. याचं कारण सांगताना तो म्हणतो की 'रॉकी' हॉलिवुडचं एक स्वप्न साकार करतो, ते म्हणजे आपली स्वप्नं खरी होऊ शकतात हा विश्वास'
डस्टिन हॉफमन, फॉल न्यूमन, रॉबर्ड रेडफोर्डसारख्या नटांबरोबर गोल्डमनने काम केलं आणि रिचर्ड अॅटनबरोसारख्या दिग्दर्शकाबरोबरही. रिचर्ड अॅटनबरोचा 'ब्रीज टू फार' हा प्रचंड गाजलेला चित्रपट आहे. याच नावाच्या दुस-या महायुद्धाच्या पुस्तकावर तो आधारित आहे. १९७६ मध्ये तो दहा महिने रोज सकाळी ६ वाजता हजर असे आणि अठरा तास काम करी. यातला पॅराशूटचा सीन, पुन्हा शूट करण्यासाठी दिग्दर्शकाला निर्मात्याबरोबर भांडावं लागलं. पण त्या एकाच सीनसाठीही चित्रपट लक्षात राहतो.
या पुस्तकात अनेक ठिकाणी त्याने पटकथांचे तुकडे दिले आहेत.
गोल्डमन सांगतो की, कोणता सिनेमा चालेल किंवा आपटेल हे सांगता येत नाही. फक्त प्रेक्षकांच्या दृष्टीने त्याची भट्टी जमली आहे की नाही एवढंच सांगता येतं. आपल्याकडची नट-नट्यांची किंवा इतर आत्मचरित्र एक तर मिळमिळीत असतात किंवा मी कसा झालो हे सांगणारी असतात. त्यामानाने हे एक रोखठोक आत्मचरित्र वाचल्यावर सिनेक्षेत्राविषयी बरंच काही कळतं जे कधी कळलेलं नसतं. पॉल न्यूमनसारखा नट एकच संवाद श्वास घेण्यापूर्वी आणि श्वास घेतल्यानंतर म्हणून काय फरक पाडतो, ते त्याने सांगितलंय. अशा कितीतरी गोष्टींसाठी हे पुस्तक वाचायला हवं, तसंच सिनेमा म्हणजे नुसतं ग्लॅमर नव्हे, हे कळण्यासाठीही!
अॅडव्हेंचर्स इन द स्क्रीन ट्रेड (पर्सनल व्ह्यू ऑफ हॉलिवूड अँड स्क्रिन रायटिंग)
( लेखक - विल्यम गोल्डमन)
-अभी
| हे लेखन |
Tuesday, August 14, 2012
.
पाती निथळत होती,
रानात गार निजलेल्या
पणतीचे क्षुब्ध उसासे,
पाहुन वाती भिजलेल्या
ती घेऊन आली नाही
मी वाट पाहुनी थकलो
स्मरणे उधार नेलेली
मी फेडु नाही शकलो
रानटी धार चाकुची
मैत्री निभवी गवताशी
जहाज बुडल्यानंतर
हसलो मीच स्वताशी
संपन्न शांत नगरीत
ढग काळा आला होता
मंदिरी दुर रामाच्या
तो रावण आला होता
रोपास बोलली ती
फुले गोड उद्याची
फक्त जिवंत ठेवा
विहीर ती ह्र्द्याची
-अभी
रानात गार निजलेल्या
पणतीचे क्षुब्ध उसासे,
पाहुन वाती भिजलेल्या
ती घेऊन आली नाही
मी वाट पाहुनी थकलो
स्मरणे उधार नेलेली
मी फेडु नाही शकलो
रानटी धार चाकुची
मैत्री निभवी गवताशी
जहाज बुडल्यानंतर
हसलो मीच स्वताशी
संपन्न शांत नगरीत
ढग काळा आला होता
मंदिरी दुर रामाच्या
तो रावण आला होता
रोपास बोलली ती
फुले गोड उद्याची
फक्त जिवंत ठेवा
विहीर ती ह्र्द्याची
-अभी
| हे लेखन |
Saturday, August 11, 2012
पाऊस
पाऊस घनातुन झरतो
पाऊस मनातुन झरतो
पाऊस सरुनी सुद्धा
पाऊस मनामधे उरतो
पाऊस भिजवुन जातो
पाऊस थिजऊन जातो
एकेक श्वास स्मरणांचा
हलकेच उसवुन जातो
पाऊस उधाण असतं
पाऊस गाणं असतं
ओठावर ओघळणार्या
थेंबांना पिणं असतं
पावसाच वेगळ नसतं
आपल्या सारखच असत
मनात लपलेलं असत
घनातुन तेच बरसत
-अभी
पाऊस मनातुन झरतो
पाऊस सरुनी सुद्धा
पाऊस मनामधे उरतो
पाऊस भिजवुन जातो
पाऊस थिजऊन जातो
एकेक श्वास स्मरणांचा
हलकेच उसवुन जातो
पाऊस उधाण असतं
पाऊस गाणं असतं
ओठावर ओघळणार्या
थेंबांना पिणं असतं
पावसाच वेगळ नसतं
आपल्या सारखच असत
मनात लपलेलं असत
घनातुन तेच बरसत
-अभी
| हे लेखन |
Friday, July 27, 2012
गंध
काही गंध आणि त्याच्या निगडीत आठवणी मनात इतके गहिरे बसलेले असतात कि कधी तो गंध अनुभवायला मिळाला कि व. पुं. नी सांगितल्या प्रमाणे मुंग्या बाहेर पडाव्यात तशा आठवणी बाहेर पडु लागतात. अशाच काही आठवणी तुम्हा समोर मांडण्याचा हा प्रपंच. आज बसमधे कोणीतरी मोगर्याचे अत्तर लावले होते. प्रचंड घमघमाट सुटला होता. दिवसाची सुरुवात तर एकदम राजेशाही झाली पण मनी आठव येण्याची ती नांदी ठरली.
लहानपणी सर्वात प्रथम जर वासाची ओळख झाली असेल तर ती म्हणजे दुधाच्या वासाची. आणि जेंव्हा माझ्या बालबुद्धीला नाकाचा हा ही उपयोग होऊ शकतो असे कळल्यावर नंतर बरीच वर्षे प्रत्येक वस्तुचा वास घेण्याची सवय बरीच वर्षे होती.
नंतर मग शाळॅच्या पुस्तकामधे जेंव्हा वाचले गुलाब हे सुवासिक फुल आहे तेंव्हा गुलाबाचा वास मुद्दामुन घेतला. आणि ती गोष्ट एवढी डोक्यात बसली कि कधीही हातात गुलाब आला कि आपोआप तो नाकापुढे यायचा. पण गुलाबाचा सुगंध मला फार ओव्हररेटेड वाटतो.
मला फुलांमधे मला सर्वात आवडणारा गंध म्हणजे रातराणीचा. माझ्या जुन्या ऑफिसच्या पार्किंगच्या रस्त्यावर रातराणीची फुले यायची. त्याचा सुगंध आल्यावर इतकं हरखायला व्हायचं कि मी मुद्दामुन थोड तिथे घुटमळायचो आणि पुढे जायचो. आमच्या घरी कुंडित रातराणी लावण्याचा बराच प्रयत्न केला पण फुले काही आली नाहीत.
फुलांमधे दुसरा आवडता गंध म्हणजे मोगर्याचा. पण इथे एक गोची व्हायची. एक कळीला हातात घेऊन मन नाही भरायचे आणि गजरा या प्रकाराला हिंदी चित्रपटाने एवढे हाईप केले होते कि गजरा हातात घेतला कि मुलगा वाईट मार्गाला लागला. मग आम्ही गजरा विकत घेऊन खिडकीच्या गजावर लावायचो. हवेच्या प्रत्येक झुळकेबरोबर मोगर्याचा सुगंध खोलीत यायचा.
आता हा फुलांच्या सुगंधाचा विषय निघाला असता पिवळा चाफा विसरुन कसे चालेल. मला आठवते दर भाउबीजेला जेंव्हा आम्ही आजीच्या भावाकडे जायचो त्यांच्या बंगल्याच्या आवारात पिवळ्या चाफ्याचे झाड होते. पिवळा चाफा फुलला असता तर सुगंध देतोच पण कोमेजुन गेल्यावरही त्याचा गंध येत रहातो. सकाळी शिकवणी साठी जाताना अप्पा बळवंत चौकात एकजण पिवळा चाफाची टोपली घेऊन बसायचा. त्याच्या टोपलीत फुलांचे दहा पंधरा वाटे असायचे. त्याच्या शिवाय मला पिवळा चाफा एवढा नियमित आणि एस्क्लुझिवली विकताना दिसला नाही. तोही दर्दीच असणार.
आता नवीत घरी पिवळा चाफा लावला आहे. त्यामुळे पिवळा चाफा हा आठवण या सदरात कधीच जाणार नाही.
-अभी
लहानपणी सर्वात प्रथम जर वासाची ओळख झाली असेल तर ती म्हणजे दुधाच्या वासाची. आणि जेंव्हा माझ्या बालबुद्धीला नाकाचा हा ही उपयोग होऊ शकतो असे कळल्यावर नंतर बरीच वर्षे प्रत्येक वस्तुचा वास घेण्याची सवय बरीच वर्षे होती.
नंतर मग शाळॅच्या पुस्तकामधे जेंव्हा वाचले गुलाब हे सुवासिक फुल आहे तेंव्हा गुलाबाचा वास मुद्दामुन घेतला. आणि ती गोष्ट एवढी डोक्यात बसली कि कधीही हातात गुलाब आला कि आपोआप तो नाकापुढे यायचा. पण गुलाबाचा सुगंध मला फार ओव्हररेटेड वाटतो.
मला फुलांमधे मला सर्वात आवडणारा गंध म्हणजे रातराणीचा. माझ्या जुन्या ऑफिसच्या पार्किंगच्या रस्त्यावर रातराणीची फुले यायची. त्याचा सुगंध आल्यावर इतकं हरखायला व्हायचं कि मी मुद्दामुन थोड तिथे घुटमळायचो आणि पुढे जायचो. आमच्या घरी कुंडित रातराणी लावण्याचा बराच प्रयत्न केला पण फुले काही आली नाहीत.
फुलांमधे दुसरा आवडता गंध म्हणजे मोगर्याचा. पण इथे एक गोची व्हायची. एक कळीला हातात घेऊन मन नाही भरायचे आणि गजरा या प्रकाराला हिंदी चित्रपटाने एवढे हाईप केले होते कि गजरा हातात घेतला कि मुलगा वाईट मार्गाला लागला. मग आम्ही गजरा विकत घेऊन खिडकीच्या गजावर लावायचो. हवेच्या प्रत्येक झुळकेबरोबर मोगर्याचा सुगंध खोलीत यायचा.
आता हा फुलांच्या सुगंधाचा विषय निघाला असता पिवळा चाफा विसरुन कसे चालेल. मला आठवते दर भाउबीजेला जेंव्हा आम्ही आजीच्या भावाकडे जायचो त्यांच्या बंगल्याच्या आवारात पिवळ्या चाफ्याचे झाड होते. पिवळा चाफा फुलला असता तर सुगंध देतोच पण कोमेजुन गेल्यावरही त्याचा गंध येत रहातो. सकाळी शिकवणी साठी जाताना अप्पा बळवंत चौकात एकजण पिवळा चाफाची टोपली घेऊन बसायचा. त्याच्या टोपलीत फुलांचे दहा पंधरा वाटे असायचे. त्याच्या शिवाय मला पिवळा चाफा एवढा नियमित आणि एस्क्लुझिवली विकताना दिसला नाही. तोही दर्दीच असणार.
आता नवीत घरी पिवळा चाफा लावला आहे. त्यामुळे पिवळा चाफा हा आठवण या सदरात कधीच जाणार नाही.
-अभी
| हे लेखन |
Subscribe to:
Posts (Atom)